शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

राज्य व परराज्यातील परवानगीबाबत बुधवारपासून निर्णय कळवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:11 IST

राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच बाहेरच्या राज्यातील जिल्ह्यात प्रवासाच्या परवानगीसाठी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले त्याच्या परवानगीबाबत येत्या ६ मे रोजी कळविण्यात येईल, तसेच ई-पास संदर्भात २ मेनंतरच्या अजार्बाबत ८ मेपासून निर्णय घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे४,४९० जणांनी केली शासकीय वाहनांची मागणी स्वत:च्या वाहनाने जाण्याबाबत २,४७२ अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच बाहेरच्या राज्यातील जिल्ह्यात प्रवासाच्या परवानगीसाठी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले त्याच्या परवानगीबाबत येत्या ६ मे रोजी कळविण्यात येईल, तसेच ई-पास संदर्भात २ मेनंतरच्या अजार्बाबत ८ मेपासून निर्णय घेण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती देत याबाबत पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. परवानगीचा अर्ज ज्या जिल्ह्यासाठी आहे त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतल्यानंतरच परवानगी देण्यात येईल, असेही स्पष्ट केले.जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, परवानगी मिळण्याबाबतच्या अर्जामध्ये ४,४९० अर्ज शासनाने वाहन व्यवस्था करावी याबाबतचे आहेत. रेल्वेची व्यवस्था झाल्यावर मोबाईलवर अर्जदारास कळविण्यात येणार आहे. स्वत:च्या वाहनाने जाण्याबाबत २,४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ८३ अर्ज नागपूर शहरातील कंटोन्मेंट झोनमधील असल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. २२६ अर्जदारांनी नागपूर येथील त्यांचा पत्ता नमूद केला नाही व अपूर्ण आहे. उर्वरित २,१५३ अर्जांमध्ये ते ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आला. या २,१५३ अर्जदारांना ६ मे रोजी महानगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी कार्यालय येथील सेतू अथवा तहसील कार्यालयामधून परवानगीचे वितरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ८६२ अर्जदारांच्या परवानगीचे वितरण संबंधित तहसीलदार कार्यालयातून केल्या जाणार आहे.परवानगीसाठी महाराष्ट्र पोलीस ई-पास प्रणालीवर ज्या अर्जदारांनी नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरील क्षेत्रातून अर्ज केले आहेत, त्याबाबत ऑनलाईन ८ मेपासून कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस