शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
3
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
4
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
5
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
6
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
7
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
8
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
9
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
10
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
11
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
12
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
13
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
14
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
15
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
16
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
17
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
18
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
19
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
20
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचे भूसंपादन रद्द करण्याचा निर्णय कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:55 IST

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील ५१० एकर जमिनीचे संपादन रद्दबातल ठरविण्याचा गेल्या २७ जुलैचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला दणका

आॅनलाईन लोकमतनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील ५१० एकर जमिनीचे संपादन रद्दबातल ठरविण्याचा गेल्या २७ जुलैचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला आहे. परिणामी, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला जोरदार दणका बसला आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी महामंडळ आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यास महामंडळाला नव्याने भूसंपादन प्रक्रिया राबवून शेतमालकांना २०१३ मधील नवीन कायद्यानुसार मोबदला द्यावा लागेल.सदर जमीन अड्याळ गावातील (ता. पवनी) असून ती प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येते. या भूसंपादनासाठी भूसंपादन कायद्याच्या कलम ४ अंतर्गत १६ जून २०११ रोजी पहिली तर, कलम ६ अंतर्गत ८ आॅगस्ट २०१२ रोजी अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर ३० आॅक्टोबर २०१४ रोजी ४० कोटीवर रुपयांच्या मोबदल्याचा निवाडा जारी करण्यात आला होता. त्याविरुद्ध २०१५ मध्ये महेश शृंगारपवार व इतर २४ शेतकºयांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. कायद्याच्या कलम ११-ए प्रमाणे मोबदल्याचा निवाडा ८ आॅगस्ट २०१२ पासून दोन वर्षांत म्हणजे ८ आॅगस्ट २०१४ किंवा त्यापूर्वी जारी करणे आवश्यक होते. परंतु, भूसंपादन अधिकाऱ्यांनी विलंबाने निवाडा जारी करून कलम ११-ए मधील तरतुदीचे उल्लंघन केले. परिणामी, भूसंपादन रद्दबादल ठरविण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.गेल्या २७ जुलै रोजी उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची याचिका मंजूर करून वादग्रस्त भूसंपादन प्रक्रिया रद्दबादल ठरवली. तसेच, कलम ११-ए मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे भंडारा जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी व इतर संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार करवाई करण्याचे निर्देश शासनाला दिलेत. एवढेच नाही तर, याप्रकरणात विविध प्रकारची अनियमितता व अवैधता झाल्याचे निरीक्षणही नोंदविले. या निर्णयावर पुनर्विचार व्हावा यासाठी पाटबंधारे महामंडळाने अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व अरुण उपाध्ये यांनी विविध बाबी लक्षात घेता खारीज केला आहे. त्यामुळे महामंडळापुढे आता सर्वोच्च न्यायालयाचा एकमेव पर्याय उपलब्ध राहिला आहे. महामंडळातर्फे अ‍ॅड. व्ही. जी. पळशीकर यांनी बाजू मांडली. मुख्य प्रकरणात शेतकऱ्यांतर्फे अ‍ॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले होते.

 

 

टॅग्स :Damधरण