शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

गोसेखुर्दचे भूसंपादन रद्द करण्याचा निर्णय कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:55 IST

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील ५१० एकर जमिनीचे संपादन रद्दबातल ठरविण्याचा गेल्या २७ जुलैचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला दणका

आॅनलाईन लोकमतनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील ५१० एकर जमिनीचे संपादन रद्दबातल ठरविण्याचा गेल्या २७ जुलैचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला आहे. परिणामी, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला जोरदार दणका बसला आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी महामंडळ आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यास महामंडळाला नव्याने भूसंपादन प्रक्रिया राबवून शेतमालकांना २०१३ मधील नवीन कायद्यानुसार मोबदला द्यावा लागेल.सदर जमीन अड्याळ गावातील (ता. पवनी) असून ती प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येते. या भूसंपादनासाठी भूसंपादन कायद्याच्या कलम ४ अंतर्गत १६ जून २०११ रोजी पहिली तर, कलम ६ अंतर्गत ८ आॅगस्ट २०१२ रोजी अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर ३० आॅक्टोबर २०१४ रोजी ४० कोटीवर रुपयांच्या मोबदल्याचा निवाडा जारी करण्यात आला होता. त्याविरुद्ध २०१५ मध्ये महेश शृंगारपवार व इतर २४ शेतकºयांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. कायद्याच्या कलम ११-ए प्रमाणे मोबदल्याचा निवाडा ८ आॅगस्ट २०१२ पासून दोन वर्षांत म्हणजे ८ आॅगस्ट २०१४ किंवा त्यापूर्वी जारी करणे आवश्यक होते. परंतु, भूसंपादन अधिकाऱ्यांनी विलंबाने निवाडा जारी करून कलम ११-ए मधील तरतुदीचे उल्लंघन केले. परिणामी, भूसंपादन रद्दबादल ठरविण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.गेल्या २७ जुलै रोजी उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची याचिका मंजूर करून वादग्रस्त भूसंपादन प्रक्रिया रद्दबादल ठरवली. तसेच, कलम ११-ए मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे भंडारा जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी व इतर संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार करवाई करण्याचे निर्देश शासनाला दिलेत. एवढेच नाही तर, याप्रकरणात विविध प्रकारची अनियमितता व अवैधता झाल्याचे निरीक्षणही नोंदविले. या निर्णयावर पुनर्विचार व्हावा यासाठी पाटबंधारे महामंडळाने अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व अरुण उपाध्ये यांनी विविध बाबी लक्षात घेता खारीज केला आहे. त्यामुळे महामंडळापुढे आता सर्वोच्च न्यायालयाचा एकमेव पर्याय उपलब्ध राहिला आहे. महामंडळातर्फे अ‍ॅड. व्ही. जी. पळशीकर यांनी बाजू मांडली. मुख्य प्रकरणात शेतकऱ्यांतर्फे अ‍ॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले होते.

 

 

टॅग्स :Damधरण