शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

एक लाखावर शेतकºयांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:20 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केल्यानंतर दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून शेतकºयांना सन्मानाने कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यामुळे शेतकºयांचा सातबारा कोरा झाला आहे.

ठळक मुद्दे८३५ कोटी ५५ लाखाचा लाभ : पात्र शेतकºयांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केल्यानंतर दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून शेतकºयांना सन्मानाने कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यामुळे शेतकºयांचा सातबारा कोरा झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे १ लाख ५ हजार १७७ लाभार्थी शेतकºयांना पात्रतेच्या निकषानुसार लाभ मिळणार असून, सुमारे ८३५ कोटी ५५ लक्ष रुपयांची याअंतर्गत कर्जमाफी मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली.या महत्त्वाकांक्षी व ऐतिहासिक कर्जमाफी योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण तसेच कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांचा सत्कार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, आ. डॉ. मिलिंद माने तसेच जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.कर्जमुक्त शेतकºयांची नावेनागपूर ग्रामीण : अजय दादाराव ढोले बोरगाव यांचे (९०,८०६), गोविंदा नामदेव वानखेडे येरला (९३३४९) रुपये, कामठी तालुका- किरण दिनेश भारती पावनगाव (२२,४१०) रुपये, बाबा भगवान रासेकर नांदा (२८,४५३) रुपये, हिंगणा तालुका-नत्थुजी नारायण घरत मु. सावंगी देवळी (१,१८,६२८), मनोहर पांडुरंग मानकर सालई मेंढा (१,१७,८०८), कळमेश्वर तालुका- तुळशीराम शंकरराव पांडेकर कोहळी (१,३५,४७८), मधुकर नीळकंठराव मानकर दहेगाव (१,३८,६७९), नरखेड तालुका- रामराव उकंडराव पांडे बानोर (१,०४,३२९), श्रीमती रेणुकाबाई अरुण गावंडे मोगरा (७३,७६७), सावनेर तालुका- संजय रामचंद्र केणे इटनगोटी (७७,९४९), विलास विठ्ठलराव राऊत पाटणसावंगी (१,०६,२०६), पारशिवनी तालुका- धनराज पांडे वराडा (३५,३६७), उत्तम शेषराव ठाकरे केरडी (६०,९२६), रामटेक तालुका- होमराज नामदेव आष्टनकर बोजापूर (३२,३८८), हिरामण श्रीराम हिंगे मानापूर (७५,१६७), मौदा तालुका- पुजाराम दशरथ फुकट माथनी (४५,९६८), मोरेश्वर कोठीराम डांगरे मांगलीतेली. कुही तालुका- सहादेव रामा मरघडे सिल्ली (५९,२५१), युवराज नागोजी वैद्य सिल्ली (७६,७०९), उमरेड तालुका- अंकुश रामाजी सराटे बोरगाव कलांद्री (६७,७३३), केशव शंकर बानाईत बोरगाव कलांद्री (१,४०,६८०), भिवापूर तालुका- पंढरी तुकाराम वैरागडे कोलारी (१,२९,८४९), संतोष तुकाराम शेळके भागेबोरी (१,३०,२९५).\दिलासा मिळाला, शेतकºयांच्या प्रतिक्रियामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांना कर्जमाफीची योजना जाहीर केली आणि दिवाळीपूर्वीच प्रत्यक्ष अंमलबजावणी करून मोठा दिलासा दिला आहे. कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे नवीन कर्ज मिळत नव्हते. परंतु कर्जमाफी मिळाल्यामुळे सातबारा कोरा झाला आणि आता नवीन कर्जही मिळणार आहे. त्यामुळे नव्या उमेदीने शेती पिकविणार असल्याचा विश्वास कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांनी व्यक्त केला.