शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्यांवर कर्जमाफी हा उपाय नाही

By admin | Updated: April 2, 2017 02:26 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी हा पूर्णत: राजकीय विषय आहे. सत्ताधारी व विरोधक दोघेही त्याचा स्वार्थासाठी भांडवलासारखा उपयोग करीत आहेत.

चर्चासत्रातील सूर : सरकारच्या उपेक्षित धोरणांवर कृषितज्ज्ञांची कडाडून टीका नागपूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी हा पूर्णत: राजकीय विषय आहे. सत्ताधारी व विरोधक दोघेही त्याचा स्वार्थासाठी भांडवलासारखा उपयोग करीत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या या एकावेळच्या कर्जमाफीने सुटणार नाहीत. सरकार खरच शेतकऱ्यांप्रति गंभीर असेल तर त्यांनी सोईचे राजकारण सोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी दीर्घकालीन धोरण तयार करायला हवे, असा सूर कृषितज्ज्ञांच्या चर्चासत्रात व्यक्त झाला. अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्राइंजी. मित्र परिवारातर्फे शनिवारी सायंकाळी नागविदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित ‘कर्जमाफी-सवंग राजकारण की फसवा युक्तिवाद की दिवास्वप्न?’ या विषयावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात एस.एस.आर.बी.चे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, शेतकरी नेते व ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे, सी.आय.ए.एन. अ‍ॅग्रो इंड. अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे संचालक अरविंद बाकडे, आय.डी.बी.आय.चे माजी संचालक अर्जुन घुगल व एन. एन. झाडे यांनी आपले विचार व्यक्त केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी संयुक्तिक नाही, हे सांगताना डॉ. सी. डी. मायी म्हणाले, वारंवार दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीमुळे शेतकरी दुबळा होतोय. त्याला पुन्हा उभे करायचे असेल तर सरकारने दीर्घकालीन उपाय करायला हवे. आपले सरकार निव्वळ माती परीक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु माती परीक्षण केल्यावर पुढे नेमके काय करायचे, याकडे कुणी लक्ष देत नाही. असा वारेमाप पैसा उगाच खर्च करण्यापेक्षा त्यातून ज्याची शेती कोरडवाहू आहे अशांना महिन्याला १२०० रुपये अनुदान दिले पाहिजे, प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजे, अति उत्पादन झाले तरी कृषिमालाचे भाव कोेसळणार नाहीत, यासाठी नियोजन केले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. चंद्रकांत वानखडे यांनी मात्र कर्जमाफीचे समर्थन केले. हा सर्वात उत्तम उपाय आहे, असा माझा दावा नाही. परंतु कर्जमाफीच्या घोषणेनंतर किमान २० टक्के शेतकरी आत्महत्या थांबतात हे वास्तव आहे. परंतु सरकार शोले चित्रपटातील गब्बरसिंगसारखे वागत आहे. कृषिकर्ज जर वेळेत दिले तर कर्जमाफीची गरजच पडणार नाही. पण, सरकारची इच्छाशक्ती नाही. आताचे सत्ताधारी विरोधात असताना मला बोलावून शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करायचे. परंतु आता सत्तेत येताच त्यांच्या प्राधान्यक्रमाचे विषय बदलले आहेत. नरेंद्र जाधव, टाटा इस्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सचे उपाययोजनांवरील अहवाल पडून आहेत. पण, सरकारला तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अरविंद बाकडे म्हणाले, दूध, मसाले, गहू, कापसाच्या उत्पादनात आपला देश जगात क्रमांक एकवर आहे आणि तरीही येथे शेतकरी आत्महत्या होतात हा चिंतेचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीला सरकारचे चुकीचे कृषिधोरण कारणीभूत आहे. आजही आपल्या देशातील बहुसंख्य शेतकरी शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर निर्भर असतात. जल सिंचनाचे क्षेत्र फारच मर्यादित आहे. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या खरच सोडवायच्या असतील तर आधी सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासोबतच सहकारी शेतीसारख्या पर्यायांवरही विचार करायला हवा. अर्जुन घुगल यांनीही कर्जमाफी हा सक्षम पर्याय नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, अशी कर्जमाफी दिली तरी त्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होते ज्यांनी फार्मर बॅकिंग सिस्टीममधून कर्ज घेतलेले असते व अशा शेतकऱ्यांची संख्या फक्त १५ टक्के असते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणय पराते यांनी केले.(प्रतिनिधी) नाना, मकरंदचे उद्योग सवंग प्रसिद्धीसाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांनी शेतकऱ्यांसाठी चळवळ उभारली आहे. परंतु यांना शेतीतील काय कळते हा खरा प्रश्न आहे. हे सांगतात, आम्ही आता शेतात झाडे लावतोय. अरे पण, शेतकरी स्वत:च बांधावरील झाडे तोडतात हे त्यांना माहीत आहे का? कारण, शेतात असे झाड असले तर माकडांचे कळप या झाडावर बसतात व नंतर उभ्या पिकाची नासाडी करतात. पण, हे या अभिनेत्यांना कोण पटवून सांगणार, असे शल्य चंद्रकांत वानखडे यांनी या चर्चासत्रात व्यक्त करीत हे सर्व प्रसिद्धीसाठी असल्याकडे लक्ष वेधले.