शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
4
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
7
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
8
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
9
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
10
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
11
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
12
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
13
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
14
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
15
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
16
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
17
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
18
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
19
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
20
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?

नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:24 IST

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी दिली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे २९,१०५ शेतकऱ्यांना २१३.९१ कोटींची कर्जमाफी झाली असून, ग्रामीण बँकेमार्फत १२७७ शेतकऱ्यांच्या खात्यात ४.८४ कोटी रुपये जमा करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत ३७,७७८ शेतकऱ्यांना २०५.८५ कोटींचे कर्ज माफ झाले आहे.नागपूर जिल्ह्यात एकूण ४९ हजार शेतकऱ्यांना ३५.६३ कोटी, प्रोत्साहनपर १३,५३७ शेतकºयांना ३० कोटी, ओटीएसअंतर्गत ५,२७२ शेतकऱ्यांना ५८ कोटी असे एकूण ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे.नागपूर जिल्हा खरीप पीक कर्ज वाटपांतर्गत डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ३७०० लाख, राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत ५४,२०३ लाख, ग्रामीण बँकेमार्फत १३२९ लाख, असे एकूण ५९२.३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.संत्रा नर्सरी प्रशिक्षणासाठी २५ लक्ष रुपयेजिल्ह्यातील संत्रा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासोबतच संत्र्याच्या कलमा तयार करण्यासाठी संत्रा नर्सरी प्रशिक्षण आयोजित करावे, अशी सूचना सदस्यांनी केली असता, संत्रा नर्सरी प्रशिक्षणासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तीर्थस्थळ विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पशुसंवर्धन, आरोग्य विभागाच्या विविध योजना, दुग्धविकास तसेच इतर योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.दीक्षाभूमी विकासासाठी मंजूर १०० कोटी निधीपैकी ५० कोटी निधी ड्रॅगन पॅलेस, ताजबाग यासाठीचा विकास निधी वितरित करण्यात आला आहे.मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते विकास योजनेंतर्गत ६००किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले असून, या रस्त्यांच्या बांधकामालाही प्राधान्य द्यावे, अशी सूचना करण्यात आली. जिल्हा नियोजन मंडळातर्फे शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, चार स्मशानभूमीवर पर्यावरणपूरक शवदाहिनी बसविण्यात येत आहे यापैकी मोक्षधाम येथे २ कोटी ४० लक्ष रुपये खर्चास मान्यता देण्यात आली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.दुष्काळग्रस्त भागातील कामांना प्राधान्यजिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागातील कामांना प्राधान्य देण्यासाठी सोबत शैक्षणिक शुल्क माफ करणे तसेच पीक विमा योजनेचा लाभ देण्यासंदर्भातही यावेळी निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीFarmerशेतकरी