शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:24 IST

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी दिली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे २९,१०५ शेतकऱ्यांना २१३.९१ कोटींची कर्जमाफी झाली असून, ग्रामीण बँकेमार्फत १२७७ शेतकऱ्यांच्या खात्यात ४.८४ कोटी रुपये जमा करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत ३७,७७८ शेतकऱ्यांना २०५.८५ कोटींचे कर्ज माफ झाले आहे.नागपूर जिल्ह्यात एकूण ४९ हजार शेतकऱ्यांना ३५.६३ कोटी, प्रोत्साहनपर १३,५३७ शेतकºयांना ३० कोटी, ओटीएसअंतर्गत ५,२७२ शेतकऱ्यांना ५८ कोटी असे एकूण ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे.नागपूर जिल्हा खरीप पीक कर्ज वाटपांतर्गत डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ३७०० लाख, राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत ५४,२०३ लाख, ग्रामीण बँकेमार्फत १३२९ लाख, असे एकूण ५९२.३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.संत्रा नर्सरी प्रशिक्षणासाठी २५ लक्ष रुपयेजिल्ह्यातील संत्रा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासोबतच संत्र्याच्या कलमा तयार करण्यासाठी संत्रा नर्सरी प्रशिक्षण आयोजित करावे, अशी सूचना सदस्यांनी केली असता, संत्रा नर्सरी प्रशिक्षणासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तीर्थस्थळ विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पशुसंवर्धन, आरोग्य विभागाच्या विविध योजना, दुग्धविकास तसेच इतर योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.दीक्षाभूमी विकासासाठी मंजूर १०० कोटी निधीपैकी ५० कोटी निधी ड्रॅगन पॅलेस, ताजबाग यासाठीचा विकास निधी वितरित करण्यात आला आहे.मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते विकास योजनेंतर्गत ६००किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले असून, या रस्त्यांच्या बांधकामालाही प्राधान्य द्यावे, अशी सूचना करण्यात आली. जिल्हा नियोजन मंडळातर्फे शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, चार स्मशानभूमीवर पर्यावरणपूरक शवदाहिनी बसविण्यात येत आहे यापैकी मोक्षधाम येथे २ कोटी ४० लक्ष रुपये खर्चास मान्यता देण्यात आली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.दुष्काळग्रस्त भागातील कामांना प्राधान्यजिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागातील कामांना प्राधान्य देण्यासाठी सोबत शैक्षणिक शुल्क माफ करणे तसेच पीक विमा योजनेचा लाभ देण्यासंदर्भातही यावेळी निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीFarmerशेतकरी