शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:24 IST

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी दिली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे २९,१०५ शेतकऱ्यांना २१३.९१ कोटींची कर्जमाफी झाली असून, ग्रामीण बँकेमार्फत १२७७ शेतकऱ्यांच्या खात्यात ४.८४ कोटी रुपये जमा करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत ३७,७७८ शेतकऱ्यांना २०५.८५ कोटींचे कर्ज माफ झाले आहे.नागपूर जिल्ह्यात एकूण ४९ हजार शेतकऱ्यांना ३५.६३ कोटी, प्रोत्साहनपर १३,५३७ शेतकºयांना ३० कोटी, ओटीएसअंतर्गत ५,२७२ शेतकऱ्यांना ५८ कोटी असे एकूण ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे.नागपूर जिल्हा खरीप पीक कर्ज वाटपांतर्गत डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ३७०० लाख, राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत ५४,२०३ लाख, ग्रामीण बँकेमार्फत १३२९ लाख, असे एकूण ५९२.३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.संत्रा नर्सरी प्रशिक्षणासाठी २५ लक्ष रुपयेजिल्ह्यातील संत्रा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासोबतच संत्र्याच्या कलमा तयार करण्यासाठी संत्रा नर्सरी प्रशिक्षण आयोजित करावे, अशी सूचना सदस्यांनी केली असता, संत्रा नर्सरी प्रशिक्षणासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तीर्थस्थळ विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पशुसंवर्धन, आरोग्य विभागाच्या विविध योजना, दुग्धविकास तसेच इतर योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.दीक्षाभूमी विकासासाठी मंजूर १०० कोटी निधीपैकी ५० कोटी निधी ड्रॅगन पॅलेस, ताजबाग यासाठीचा विकास निधी वितरित करण्यात आला आहे.मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते विकास योजनेंतर्गत ६००किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले असून, या रस्त्यांच्या बांधकामालाही प्राधान्य द्यावे, अशी सूचना करण्यात आली. जिल्हा नियोजन मंडळातर्फे शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, चार स्मशानभूमीवर पर्यावरणपूरक शवदाहिनी बसविण्यात येत आहे यापैकी मोक्षधाम येथे २ कोटी ४० लक्ष रुपये खर्चास मान्यता देण्यात आली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.दुष्काळग्रस्त भागातील कामांना प्राधान्यजिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागातील कामांना प्राधान्य देण्यासाठी सोबत शैक्षणिक शुल्क माफ करणे तसेच पीक विमा योजनेचा लाभ देण्यासंदर्भातही यावेळी निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीFarmerशेतकरी