शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

-अन् मृत्यू स्पर्शून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:40 IST

सकाळी ६.३० वाजताची वेळ असेल...साखरझोपेतून नीट जागही आली नव्हती...मुंबई गाठायला आणखी तासभर उशीर असल्याने जवळपास सर्वच प्रवासी बर्थवर पडून होते...

ठळक मुद्देनागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचा अपघात प्रवाशांनी सांगितला थरार : विधात्याचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सकाळी ६.३० वाजताची वेळ असेल...साखरझोपेतून नीट जागही आली नव्हती...मुंबई गाठायला आणखी तासभर उशीर असल्याने जवळपास सर्वच प्रवासी बर्थवर पडून होते...अशा बेसावध क्षणी अचानक जोराचा आवाज झाला...गाडीची लय बिघडली व पाहता पाहता इंजिनसह सात डबे रुळावरून घसरले...वरच्या बर्थचे प्रवासी खाली कोसळले...सामानही अस्ताव्यस्त झाले...काही तरी अघटित घडल्याची जाणीव झाली...सगळे शांत झाल्यावर बाहेर डोकावून पाहिले तेव्हा...काळजात चर्र झाले...प्रत्यक्ष मृत्यू आम्हाला स्पर्शून गेला होता...या प्रतिक्रिया आहेत नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचा अपघात अनुभवणाºया नागपूरकर प्रवाशांच्या. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचा मंगळवारी सकाळी मुंबईजवळ आसनगाव-वासिंददरम्यान अपघात झाला. या गाडीतील प्रवाशांनी स्वत:ला सुरक्षित असल्याचे पाहून विधात्याचे आभार मानले.पालकमंत्र्यांनी केली गाड्यांची व्यवस्थाअपघात होताच माजी आमदार आशिष जैस्वाल यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. जिल्हाधिकाºयांनी ही माहिती रेल्वे डीआरएमला कळविली व मदतीसाठी नाशिक जिल्हाप्रशासनाशी संपर्क साधला. यानंतर जैस्वाल यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. घटनेचा, घटनेनंतरच्या परिस्थितीचा व्हिडिओ व फोटो पाठविले. पालकमंत्र्यांनी लगेच दखल घेत संकटग्रस्त प्रवाशांसाठी गाड्या पाठविण्याची व्यवस्था केली. काही प्रवाशांना या गाड्यांतून नाशिकला सुखरूप पोहोचविण्यात आले. याशिवाय पालकमंत्र्यांनी नागपूर व नाशिक जिल्हाधिकाºयांसह अपघातग्रस्त लोकप्रतिनिधी व प्रवाशांच्या संपर्कात राहून घटनेचा आढावा घेतला.भीषण संकट टळले‘सर्व प्रवासी झोपेत होते. आसनगाव स्टेशनच्या पुढे जोरात झटका बसला. बर्थवरील काही प्रवासी धक्का दिल्यासारखे खाली पडले. एकच आरडाओरड झाली. गाडी अचानक थांबली आणि कुणालाच काही सुचले नाही. काही लोकांनी खिडकीतून बाहेर डोकावले असता गाडीच्या इंजिनला लागून असलेले डबे रुळाखाली घसरले होते. १५ मिनिटातच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची भीषणता लक्षात घेता मोठा घातपात झाल्याचे दिसत होते. परंतु कुणालाही यात मोठी दुखापत झाली नाही. गाडीचा वेग कमी असल्यामुळे प्रवाशांवर आलेले भीषण संकट टळले.’-जस्टीन राव, पत्रकार४९३ प्रवाशांचा जीव आला असता धोक्यातदुरांतोच्या अपघातात या गाडीचे आठ कोच रुळाखाली घसरले. गाडीचा वेग कमी असल्यामुळे या कोचला अपघात झाला नाही नाहीतर ४९३ प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला असता. रुळावरून घसरलेल्या कोचमध्ये एच १ या कोचमध्ये २३ प्रवासी, ए १ या कोचमध्ये ५२, ए २ कोचमध्ये ५२, ए ३ कोचमध्ये ५२, बी १ या कोचमध्ये ७४, बी २ कोचमध्ये ८०, बी ३ कोचमध्ये ८० आणि बी ४ या कोचमध्ये ८० असे एकूण ४९३ प्रवासी होते. रुळावरून घसरून हे कोच न उलटल्यामुळे या प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.मृत्यू जवळून पाहिलासकाळी ६.१५ च्या सुमारास दुरंतोच्या ड्रायव्हरला रुळावर दरड कोसळल्याचे दिसले. त्याने इमरजन्सी ब्रेक मारले. यात गाडीचे इंजिन व सात डबे उलटले. मी ए १ कोचमध्ये ३७ क्रमांकाच्या बर्थवर होतो. सोबत आ. नागो गाणार व माजी खासदार डॉ. खुशाल बोपचेही होते. गाडीचे डबे एकाएक पलटले व आम्ही सर्वच खाली कोसळलो. एकमेकांच्या अंगावर प्रवासी व सामानांचा थर लागला होता. लगेच डब्यातून बाहेर पडलो. प्रवासी एकमेकांच्या मदतीला धावले. आधी सर्वांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर काही वेळांनी सामान बाहेर काढले. डबे उलटलेल्या ठिकाणी बाजूलाच नदी दुथडी भरून वाहत होती. डबे घसरून नदीत पडले असते तर माझ्यासकट अनेकांना जीव गमवावा लागला असता. कसारा घाटामुळे गाडीचा वेग कमी होता. हा अपघात दुसºया ठिकाणी झाला असता तर नक्कीच मोठी हानी झाली असती. आम्ही आज मृत्यू जवळून पाहिला.- आशिष जैस्वाल, माजी आमदारबालबाल बचावलो‘सकाळी ६.३० वाजता एकदम गाडी थांबली. काय झाले एकदम काहीच कळले नाही. बी-३ कोचच्या बाहेर मोठा चिखल असल्यामुळे बाहेर पडू शकत नव्हतो. लगेच गाडीचा अपघात झाल्याचे समजले. बाहेर येण्यासाठी एसी कोचमधून मागील बाजूला असलेल्या स्लिपर कोचमध्ये गेलो. अडीच किलोमीटर अंतरावरील आसनगावला स्टेशनला पायी गेलो. तेथून हायवे गाठून टॅक्सीने मुंबईला पोहोचलो. ईश्वराच्या कृपेमुळे जीव वाचल्याचा अनुभव आला.’-विक्की मुदलियार, प्रवासीमोठा घातपात टळला‘सकाळी ६.३० वाजतााच्या सुमारास माझी पत्नी बर्थवरून अचानक खाली पडली. कोचमधील प्रवासीही खडबडून जागे झाले. काहीच कळायला मार्ग नव्हता. गाडी थांबली होती. पाच-सहा जण खालून अपघात झाल्याचे ओरडत होते. खाली उतरल्यानंतर गाडीचे इंजिन पलटी झाल्याचे दिसले. एसीचे सर्व कोच रुळावरून घसरले होते. पण त्यात कुणालाही गंभीर दुखापत झाली नव्हती. गाडीचा वेग अधिक असता तर मोठा घातपात झाला असता, हे निश्चित.’-अमित रामटेके, पत्रकार