शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

विदर्भात मृत्यूचा दर २.६८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 7:11 AM

corona, Nagpur News रविवारी १५८९ रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १५६६६९ तर मृत्यूची संख्या ४२१२ झाली आहे. मृत्यूचे प्रमाण २.६८वर आले आहे.

ठळक मुद्दे१५८९ रुग्ण, ५१ मृत्यूची नोंदनागपुरात २७, अमरावतीत १० तर वर्धेत ६ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात दोन आठवड्यांपूर्वी रुग्णसंख्या तीन हजारांवर गेली होती, तर मृत्यूच्या संख्येने शंभरी गाठली होती, परंतु आता ती निम्म्यावर आली आहे. रविवारी १५८९ रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १५६६६९ तर मृत्यूची संख्या ४२१२ झाली आहे. मृत्यूचे प्रमाण २.६८वर आले आहे.

नागपूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या मंदावली आहे. ६१७ रुग्णांची नोंद झाली असून २७ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ८१४६१ तर मृतांची संख्या २६२३ झाली आहे. विशेष म्हणजे, नव्या रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे होऊ लागले आहेत. नागपुरनंतर अमरावती जिल्ह्यात आज सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. १० रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची संख्या ३११वर पोहचली. जिल्ह्यात १३९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या १४००६ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५९ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले. रुग्णसंख्या ११०२६ झाली आहे.

चार रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १६७ वर गेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज १३९ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या ७६४८ झाली. गडचिरोली जिल्ह्यात १११ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ३१९७वर पोहचली. गोंदिया जिल्ह्यात १२० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ७४६७ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात १०६ रुग्ण व तीन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ५९९० तर मृतांची संख्या १३६ वर गेली आहे.

वर्धा जिल्ह्यात सहा रुग्णांचे मृत्यूने बळींची संख्या १४० झाली. ८४ नव्या रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या ४९३६ वर गेली आहे. वाशिम जिल्ह्यात ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अकोल्यात २५ रुग्ण व एकाचा मृत्यूची नोंद झाली. सर्वात कमी रुग्णाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली. २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस