शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विदर्भात मृत्यूचा दर २.६८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 07:15 IST

corona, Nagpur News रविवारी १५८९ रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १५६६६९ तर मृत्यूची संख्या ४२१२ झाली आहे. मृत्यूचे प्रमाण २.६८वर आले आहे.

ठळक मुद्दे१५८९ रुग्ण, ५१ मृत्यूची नोंदनागपुरात २७, अमरावतीत १० तर वर्धेत ६ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात दोन आठवड्यांपूर्वी रुग्णसंख्या तीन हजारांवर गेली होती, तर मृत्यूच्या संख्येने शंभरी गाठली होती, परंतु आता ती निम्म्यावर आली आहे. रविवारी १५८९ रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १५६६६९ तर मृत्यूची संख्या ४२१२ झाली आहे. मृत्यूचे प्रमाण २.६८वर आले आहे.

नागपूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या मंदावली आहे. ६१७ रुग्णांची नोंद झाली असून २७ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ८१४६१ तर मृतांची संख्या २६२३ झाली आहे. विशेष म्हणजे, नव्या रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे होऊ लागले आहेत. नागपुरनंतर अमरावती जिल्ह्यात आज सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. १० रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची संख्या ३११वर पोहचली. जिल्ह्यात १३९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या १४००६ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५९ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले. रुग्णसंख्या ११०२६ झाली आहे.

चार रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १६७ वर गेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज १३९ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या ७६४८ झाली. गडचिरोली जिल्ह्यात १११ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ३१९७वर पोहचली. गोंदिया जिल्ह्यात १२० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ७४६७ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात १०६ रुग्ण व तीन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ५९९० तर मृतांची संख्या १३६ वर गेली आहे.

वर्धा जिल्ह्यात सहा रुग्णांचे मृत्यूने बळींची संख्या १४० झाली. ८४ नव्या रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या ४९३६ वर गेली आहे. वाशिम जिल्ह्यात ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अकोल्यात २५ रुग्ण व एकाचा मृत्यूची नोंद झाली. सर्वात कमी रुग्णाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली. २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस