शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू, हायकोर्टाची गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:24 IST

वर्धा जिल्ह्यातील प्रकरण : पोलिसांना मागितला अहवाल

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आर्वी (जि. वर्धा) येथील एका नवप्रसूत महिलेच्या मृत्यूची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणात आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. तसेच, आरोग्य उपसंचालकांना ही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांना १० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्या समक्ष सुनावणी झाली. मृत महिलेचे पती अभिजित डवरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. डवरे यांच्या पत्नीला प्रसूती करिता ३ सप्टेंबर २०२१ रोजी आर्वी येथील राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. प्रसूतीनंतर सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांच्या पत्नीला उलट्या व पोट झोंबून येण्याचा त्रास सुरू झाला. परंतु, हॉस्पिटल प्रमुख डॉ. कालिंदी राणे यांनी रात्री ९.३० वाजेपर्यंत उपचार सुरू केले नाही. त्यामुळे, डवरे यांच्या पत्नीची प्रकृती खालावली व त्या रात्री १२.३० च्या सुमारास मरण पावल्या. परिणामी, डवरे यांनी आर्वी पोलिस ठाण्यात तक्रार केली असता, अकस्मात मृत्यूची नोंद करून जिल्हा शल्य चिकित्सकांना मृत्यू संदर्भात अहवाल मागण्यात आला. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सकांनी अहवाल देण्यासाठी एक वर्ष वेळ घेतला व डॉक्टरांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केला नसल्याचा निष्कर्ष कळविला, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच, या सर्व प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. सपना जाधव यांनी कामकाज पाहिले.

या प्रकरणात आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला नाही. संबंधित महिलेचा जीव वाचविण्याकरिता आम्ही शर्तीचे प्रयत्न केले. वैद्यकीय अहवाल, शवविच्छेदन अहवाल व पोलिस अहवाल यामध्ये डॉक्टरची चूक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना डॉक्टरची बदनामी करण्याच्या उद्देशाने हे प्रकरण वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. न्यायालयाचा कोणताही आदेश आम्हाला मान्य राहील.

- डॉ. कालिंदी राणे

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयwardha-acवर्धा