शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

नागपुरात भीषण अपघातात 3 मित्रांचा मृत्यू

By admin | Updated: July 14, 2017 15:44 IST

भरधाव येणारी कार विजेच्या खांबाला आदळल्यानं भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - भरधाव येणारी कार  विजेच्या खांबाला आदळल्यानं भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.  सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेट्रो रेल्वे कार्यालयाजवळ गुरुवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला. अक्षय मल्हारी मस्के (वय २०), अभिजीत उर्फ जोजो कच्चू पायलू ( वय १८) आणि प्रणव महेश नायडू (वय १९) अशी मृतांची नावे आहेत.  
 
नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास हे तिघं अंबाझरी, सिव्हील लाईन भागात कारने (एमएच २०/ बीझेड ४७४७) फिरत होते. कार अक्षय मस्के चालवत होता. सिव्हील लाईन्सकडे जात असताना कार चालवताना त्यांच्यात मज्जामस्ती सुरू होती.
 
कारचा वेग गरजेपेक्षाही जास्त होता. मेट्रो रेल्वे कार्यालयाजवळचा भाग चढ-उताराचा असून तेथे धोकादायक पद्धतीचे वळणही आहे. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे अपघातस्थळी कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला धडकून समोरच्या झाडावर आदळली. 
 
या अपघातात कारचाच चेंदामेंदा झाला.  वाटसरुंनीअपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. कार अगदी वाईट पद्धतीनं आदळल्यानं  अक्षय, अभिजीत व प्रणव तिघेही कारमध्ये अडकले व गंभीर स्वरुपात ते जखमी झाले होते. 
नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. तिघांचीही प्रकृती चिंताजनक होती. त्यांना रुणालयात नेले असता डॉक्टरांनी अभिजीत आणि प्रणवला मृत घोषित केले. तर उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी अक्षय मस्केही मृत घोषित केले. 
 
निष्काळजीपणा भोवला
तिघांचे बळी घेणा-या या अपघाताला कारचालकाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे पुढे आले आहे. कारचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षाही जास्त असावा. कारण अपघात झाल्यानंतर वेगाचे संकेत देणा-या कारमधील मीटरचा काटा १०० वर अडकून पडला होता. त्यामुळे सदर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.