शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नागपुरात भीषण अपघातात 3 मित्रांचा मृत्यू

By admin | Updated: July 14, 2017 15:44 IST

भरधाव येणारी कार विजेच्या खांबाला आदळल्यानं भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - भरधाव येणारी कार  विजेच्या खांबाला आदळल्यानं भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.  सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेट्रो रेल्वे कार्यालयाजवळ गुरुवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला. अक्षय मल्हारी मस्के (वय २०), अभिजीत उर्फ जोजो कच्चू पायलू ( वय १८) आणि प्रणव महेश नायडू (वय १९) अशी मृतांची नावे आहेत.  
 
नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास हे तिघं अंबाझरी, सिव्हील लाईन भागात कारने (एमएच २०/ बीझेड ४७४७) फिरत होते. कार अक्षय मस्के चालवत होता. सिव्हील लाईन्सकडे जात असताना कार चालवताना त्यांच्यात मज्जामस्ती सुरू होती.
 
कारचा वेग गरजेपेक्षाही जास्त होता. मेट्रो रेल्वे कार्यालयाजवळचा भाग चढ-उताराचा असून तेथे धोकादायक पद्धतीचे वळणही आहे. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे अपघातस्थळी कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला धडकून समोरच्या झाडावर आदळली. 
 
या अपघातात कारचाच चेंदामेंदा झाला.  वाटसरुंनीअपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. कार अगदी वाईट पद्धतीनं आदळल्यानं  अक्षय, अभिजीत व प्रणव तिघेही कारमध्ये अडकले व गंभीर स्वरुपात ते जखमी झाले होते. 
नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. तिघांचीही प्रकृती चिंताजनक होती. त्यांना रुणालयात नेले असता डॉक्टरांनी अभिजीत आणि प्रणवला मृत घोषित केले. तर उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी अक्षय मस्केही मृत घोषित केले. 
 
निष्काळजीपणा भोवला
तिघांचे बळी घेणा-या या अपघाताला कारचालकाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे पुढे आले आहे. कारचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षाही जास्त असावा. कारण अपघात झाल्यानंतर वेगाचे संकेत देणा-या कारमधील मीटरचा काटा १०० वर अडकून पडला होता. त्यामुळे सदर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.