शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

डेटावर आधारित पत्रकारिता ही काळाची गरज; “पत्रकारितेतील नवे आयाम” या विषयावर तज्ज्ञांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 18:39 IST

Nagpur News आगामी काळात आरोग्याचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा विषय असेल शिवाय डेटावर आधारित पत्रकारिता ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन राजस्थान विद्यापीठाच्या जनसंवाद केंद्राचे माजी प्रमुख प्रा. डॉ. संजीव भानावत यांनी केले.

नागपूर : वृत्तपत्रे व इतर सर्वच माध्यमांमध्ये वेगाने बदल होत असून काही सेकंदांमध्ये बातम्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत. परंतु फक्त माहिती पोहोचविण्यापुरती पत्रकारिता करून चालणार नाही. क्रांतिकारी पत्रकारितेचा वारसा जोपासायला हवा. आगामी काळात आरोग्याचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा विषय असेल शिवाय डेटावर आधारित पत्रकारिता ही काळाची गरज आहे तसेच ओटीटी, व्हिडीओ ऑन डिमांड व आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सचे तंत्रदेखील अभ्यासावे लागेल, असे प्रतिपादन राजस्थान विद्यापीठाच्या जनसंवाद केंद्राचे माजी प्रमुख प्रा. डॉ. संजीव भानावत यांनी केले.

मराठी पत्रकार दिनानिमित्त "पत्रकारितेतील नवे आयाम" या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ या विद्यापीठातील पत्रकारिता विभागांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्र-कुलगुरू डॉ. बी.व्ही. पवार व वरिष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे, डॉ. मोईज मन्नान हक (नागपूर), डॉ. सुधीर भटकर (जळगाव), डॉ. रवींद्र चिंचोलकर (सोलापूर), डॉ. नीशा पवार (कोल्हापूर), डॉ. उज्वला बर्वे (पुणे), डॉ. दिनकर माने (औरंगाबाद) हे उपस्थित होते. पत्रकारिता हे व्रत असून त्याद्वारे समाजबदलाची प्रक्रिया घडून येते. ही प्रक्रिया ताकदीने घडण्यासाठी नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या पत्रकारांनी बहुविध माध्यम कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन डॉ.भानावत यांनी केले. जनमत निर्माण करणारी पत्रकारिता करावी, असे मत डॉ.पवार यांनी व्यक्त केले.

माध्यमांसोबतच जनसंपर्क क्षेत्रातही करिअरच्या खूप संधी निर्माण होत आहेत. संसदीय लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांनी मनापासून प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन उमेश काशीकर यांनी केले. डॉ. नीशा पवार यांनी प्रास्ताविक केले. तेजस्विनी कांबळे यांनी संचालन केले तर डॉ. विनोद निताळे यांनी आभार मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र