शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपूर रेल्वेस्थानकावर घाण आणि दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:07 IST

नागपूरचे रेल्वेस्टेशन वर्ल्ड क्लास बनविण्याचा प्रयत्न होत असताना, रेल्वे स्थानकाच्या बाहेर कचरा, घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. लोकमतच्या टीमने रेल्वेस्टेशन परिसराचा आढावा घेतला असता, प्रशासनाची उदासिनता दिसून आली.

ठळक मुद्देप्रवासी त्रस्त प्राण्यांचाही वावर, कशी होणार वर्ल्ड क्लासकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे रेल्वेस्टेशन वर्ल्ड क्लास बनविण्याचा प्रयत्न होत असताना, रेल्वे स्थानकाच्या बाहेर कचरा, घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. लोकमतच्या टीमने रेल्वेस्टेशन परिसराचा आढावा घेतला असता, प्रशासनाची उदासिनता दिसून आली.

मुख्य द्वारासमोर पसरली आहे घाणनागपुरात येणारे प्रवासी रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून बाहेर पडतात. मुख्यद्वारासमोरच प्रवाशांना घाण आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. स्टेशन जवळील रस्त्यावर गटारीचे घाण पाणी वाहत आहे. प्रवाशांना पसरलेल्या गटाराच्या घाण पाण्यातून कसेबसे बाहेर पडावे लागत आहे.

आतमधील गटार सुद्धा तुंबलीलोकमतची टीम रेल्वे स्टेशन समोरील मुख्य द्वाराजवळील पार्किंगच्या परिसरात पोहचली. तिथे वाहनाच्या पार्किंग स्टॅण्डसमोरची गटार तुंबलेली आढळली. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन परिसरातील गणेश टेकडी रोडवरील गटार लाईन सुद्धा बऱ्याच ठिकाणी चोक झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर सतत घाण पाणी वाहत आहे. प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या अगदी समोर रेल्वेस्टेशन परिसरात १०० फुट उंच राष्ट्रध्वजाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते झाले. मात्र या परिसरातील अस्वच्छतेवर कुणाचेच लक्ष गेले नाही.

बगीच्याजवळ बनले शौचालयरेल्वे स्टेशनच्या मुख्य परिसरातील गणेश टेकडी रोडला लागून असलेल्या खाली जागेवर रेल्वे प्रशासनाने सौंदर्यीकरण करून उद्यानाच्या रुपात विकसित केली आहे. येथे स्वच्छतेचे संदेशही दिले आहे. परंतु लोकांनी तिथे शौचालयच बनविले आहे. अशा लोकांवर कारवाईचा सुद्धा प्रयत्न केला जात नाही.

डस्टबिन गायबस्वच्छ शहराचा दावा करणाऱ्या मनपा प्रशासनाने रेल्वे स्टेशनकडे दुर्लक्ष केल्याचे रेल्वे स्टेशन रोडवर पसरलेल्या घाणीवरून दिसून येते. रेल्वे स्टेशन परिसरात भिंतीला लागून डस्टबिन लावण्यात आल्या होत्या. परंतु त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे डस्टबिन गायब झाल्या असून, केवळ स्टॅण्ड उरले आहे. त्यामुळे रस्त्यावरच कचरा पसरलेला आहे.

दोन्ही यंत्रणेचे दुर्लक्षरेल्वे स्थानक परिसरात नियमित सफाईवर प्रशासनाचा जोर नसल्याचे दिसते आहे. आॅटोचालकाबरोबरच स्थानिक दुकानदारांनी सुद्धा तक्रारी केली की, सफाई कर्मचारी येथे नियमित सफाई करीत नाही. सूत्रांच्या मते रेल्वे स्टेशन परिसराच्या बाहेरील जबाबदारी मनपाची आहे. मात्र रेल्वे प्रवाशांना होत असलेल्या त्रासामुळे याची दखल रेल्वे प्रशासन सुद्धा घेऊ शकते. दोन्ही यंत्रणेचे दुर्लक्ष असल्यामुळे समस्या गंभीर होत चालली आहे.

नाक दाबूनच बाहेर पडावे लागतेरेल्वे स्थानकाचे पूर्वेकडील गेटवर सुद्धा घाण आणि कचºयाचे ढीग पसरले आहेत. तसेच प्लॅटफॉर्म नंबर ८ जवळील शौचालयाच्या भागात गटारीचे घाण पाणी साचले असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. प्रवाशांना बाहेर पडताना नाक दाबूनच निघावे लागत आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर