शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

 नागपुरातील डम्पिंग यार्डमध्ये लागली भीषण  आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 21:25 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच, भांडेवाडी कचरा डम्पिंगचा भडका सुरू झाला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून डम्पिंग यार्डमध्ये सातत्याने आग लागत आहे. शुक्रवारी आगीचा भडका चांगलाच वाढला होता. ऐन दुपारी भांडेवाडीला लागून बीडगाव रोडवर धूर पसरल्याने रस्ता दिसेनासा झाला होता. या विषारी धुरामुळे बीडगाव, तरोडी, साईबाबानगर, भांडेवाडी परिसर व वाठोडा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.

ठळक मुद्देपरिसरात पसरला धूर : नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच, भांडेवाडी कचरा डम्पिंगचा भडका सुरू झाला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून डम्पिंग यार्डमध्ये सातत्याने आग लागत आहे. शुक्रवारी आगीचा भडका चांगलाच वाढला होता. ऐन दुपारी भांडेवाडीला लागून बीडगाव रोडवर धूर पसरल्याने रस्ता दिसेनासा झाला होता. या विषारी धुरामुळे बीडगाव, तरोडी, साईबाबानगर, भांडेवाडी परिसर व वाठोडा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.शहरातील संपूर्ण कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये साठविण्यात येतो. उन्हाळ्याच्या दिवसात कचरा वाळल्याने आगीच्या घटना दरवर्षी घडतात. गेल्या तीन ते चार दिवसापासून भांडेवाडीत तुरळक आगी लागत होत्या. शुक्रवारी आगीने चांगलाच भडका घेतला, या आगीमुळे भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील वस्त्यांमध्ये आगीचा धूर पसरला आहे. बीडगावकडे जाणाºया रस्त्यावर भर दिवसा धुकंच पसरलं आहे. या धुरामुळे रस्त्यावरील वाहनांच्या अवागमनाला अडथळा होत आहे. धुराचा परिणाम वाहतुकीबरोबरच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे.भांडेवाडीत ढिगाने कचरा साठवला आहे. उन्हाळ्यात वरवर कचरा वाळतो. परंतु आतमध्ये ओलसरपणाच असतो. त्यामुळे कचऱ्याचे   विघटन होऊन मिथेन गॅस निर्माण होतो. थोडीजरी ठिणगी लागली की आगीचा भडका होतो. असाच काहीशा प्रकारातून आग लागल्याचे पर्यावरण तज्ञांचे मत आहे. मनपाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. डम्पिंग यार्डमध्ये सर्वच प्रकारचा कचरा साठविला जातो. विशेषत: प्लास्टिकचे प्रमाण अधिक असते. आगीमुळे जो धूर पसरला आहे तो शरीरासाठी घातक ठरतो आहे. जीव गुदमरतो आहे. डोळ्यात जळजळ होत आहे. खोकल्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे.दिनेश बांते, नागरिक, बीडगाव धुराचा प्रभाव आज संपूर्ण बीडगाव परिसराला जाणवला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास बीडगाव रोडवर धुकं पसरल्याचे चित्र होते. धुरामुळे समोरचा व्यक्ती दिसत नव्हता. वाहनांच्या अवागमनाला अडथळा निर्माण झाला होता. श्वसनालाही त्रास होत आहे.मुन्ना शुक्ला, माजी नगरसेवक दरवर्षी भांडेवाडी परिसरात आगी लागतात. यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. सध्या येथे मनपाचे चार टॅँकर आग विझविण्याचा कामात लागले आहे. पाण्याची नासाडी थांबवायची असल्यास, परिसरातील सिवेज ट्रीटमेंट प्लॅण्टचे पाणी वापरणे गरजेचे आहे. शिवाय कचऱ्याची सायंटिफिकरीत्या विल्हेवाट लावल्यास, कचऱ्यापासून पर्यायी वीज निर्मिती केल्यास आग लागण्याच्या समस्येला आळा बसू शकतो.कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरण तज्ञ

टॅग्स :fireआगdumpingकचरा