शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

जगबुडीच्या आधी ‘भारतबुडी’चा धोका; समुद्र किनारे गिळणार, अस्मानी संकटे वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 11:33 IST

Nagpur News भारतीय उपखंडाला मोसमी पावसाचे वरदान देणारा, जवळपास दोन अब्ज लोकसंख्येचे पोषण करणारा हिंदी महासागर ग्लाेबल वॉर्मिंगच्या दुष्टचक्रात अडकला आहे.

ठळक मुद्दे हिंदी महासागराची तापमानवाढ गंभीर वळणावरभारतीय उपखंडावर काळजीचे ढग

श्रीमंत माने/निशांत वानखेडे

नागपूर : भारतीय उपखंडाला मोसमी पावसाचे वरदान देणारा, जवळपास दोन अब्ज लोकसंख्येचे पोषण करणारा हिंदी महासागर ग्लाेबल वॉर्मिंगच्या दुष्टचक्रात अडकला आहे. जगाच्या अन्य भागांत तापमानवाढीचे संकट किती भयावह असेल ही दूरची गोष्ट पण जगबुडीच्या आधी भारतालाच हवामानबदलाचा अधिक धोका असल्याचे इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)च्या अहवालाने स्पष्ट झाले आहे.

गेल्या महिन्यात कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्राला बसलेला अतिवृष्टी व महापुराचा तडाखा, दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटना, दोन वर्षांपूर्वी केरळमधील हाहाकार, हिमालयातील आस्मानी संकटे हे निसर्गचक्र बिघडल्याचे लक्षणे आहेत. अशा आस्मानी संकटांची वैज्ञानिक कारणमीमांसा आयपीसीसीने हिंदी महासागरातील बदल केंद्रस्थानी ठेवून केली आहे.

या अहवालाने भारतीय उपखंडावर काळजीचे ढग दाटले आहेत. प्रशांत, अटलांटिक किंवा अन्य महासागरांच्या तुलनेत हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान अधिक वेगाने असल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी दरवर्षी ३.७ मिलीमीटरने वाढत आहे. सध्याच्या वेगाने एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत तीन फुटाने वाढेल व त्यामुळे समुद्रकिनारे पाण्याखाली येतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आयपीसीसीसोबत एक टूल तयार केले आहे. त्यात २०२० ते २१५० पर्यंत दर दशकात पृथ्वीवरील समुद्राची पातळी कशी कशी वाढत जाईल व कोणता भाग पाण्याखाली येईल हे कळेल. भारतातील कांडला, ओखा, भावनगर, मुंबई, मुरगाव, मंगलोर, कोची, तुतीकोरीन, चेन्नई, विशाखापट्टणम, पारादीप, किद्रोपार ही शहरे पाण्याखाली येतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

 

शंभर वर्षांचे बदल एका वर्षांत

- हिंदी महासागर हा पृथ्वीवरील तिसऱ्या क्रमांकाचा, २० टक्के पाणी सामावणारा महासागर

- तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत दरवर्षी ३.७ मिमी इतकी वाढ

- संपूर्ण एकविसाव्या शतकात समुद्राची पातळी वाढतच जाईल, असा इशारा

- औद्योगिक क्रांतीच्या आधी जे बदल शंभर वर्षांमध्ये घडत होते ते आता एकाच वर्षात

- कार्बन व द्रवरूप धुलिकणांच्या उत्सर्जनामुळे मोसमी पावसाचे वेळापत्रक विस्कळीत

- उत्सर्जन रोखण्यात यश मिळविले तर पावसाचे प्रमाण वाढण्याची भीती

टॅग्स :Earthपृथ्वी