शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

रेती घाटांचा लिलाव न झाल्याने शासनाला नुकसान

By admin | Updated: December 5, 2014 00:38 IST

पर्यावरण व वनमंत्रालयाची मंजुरी न मिळाल्याने २०१४ या वर्षात नागपूर व भंडाऱ्यांच्या रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला नाही. ज्याचा परिणाम राज्य शासनाच्या उत्पन्नावर पडला आहे.

व्हीटीएची मागणी : रेती माफिया सक्रिय नागपूर : पर्यावरण व वनमंत्रालयाची मंजुरी न मिळाल्याने २०१४ या वर्षात नागपूर व भंडाऱ्यांच्या रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला नाही. ज्याचा परिणाम राज्य शासनाच्या उत्पन्नावर पडला आहे. या दोन जिल्ह्यांच्या रेतीघाटाचा लिलाव न झाल्याने ६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे रेती माफिया सक्रिय झाले असून राज्य शासनाने रेती घाटांच्या लिलावाला मंजुरी द्यावी, अशी मागणी विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनचे सचिव तेजिंदर सिंह रेणु यांनी केली आहे. यासंदर्भात व्हीटीएतर्फे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना एक निवेदन देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनाही पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात अध्यक्ष जे.पी. शर्मा म्हणाले, बांधकाम व्यवसायात रेती अतिशय महत्त्वाची असते. नागपूर आणि भंडारा येथून रेती मागविण्यात येते. पण शासनातर्फे रेती घाटांचा लिलाव न करण्यात आल्याने रेतीच्या किमती दुप्पटीने वाढल्या आहेत. तेजिंदरसिंह रेणु म्हणाले, शासनाने रेतीघाटांंचा लिलाव न केल्याने अप्रत्यक्षपणे रेती माफियांना मदत होते आहे. रेतीच्या किमती वाढल्याने अवैध खनन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ट्रक चालकांनाही पर्याप्त काम मिळत नसल्याने चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. रेतीच्या किमतीत वाढ झाल्याने अनावश्यकरीत्या प्रकल्पांच्या किमती वाढल्या आहेत. पर्यावरण मंत्रालयाच्या परिपत्रकाप्रमाणे पाच हेक्टर आणि त्यापेक्षा कमी असलेल्या रेती घाटांना पर्यावरणाची मंजुरी घेण्याची गरज नसल्याचे माहिती दिली आहे. नागपूर आणि भंडाऱ्याचे रेती घाट पाच हेक्टरपेक्षा कमी आहे. त्यामुळे या रेती घाटांना केंद्र शासनाच्या परवानगीची गरज नाही. राज्य शासनाने या रेती घाटांचा लिलाव करून अवैध खनन थांबवावे आणि भ्रष्टाचार होऊ देऊ नये, अशी मागणी रेणु यांनी केली आहे. (प्रतिनिधी)