शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘डिम्टस्’कडून दंड आकारला जाणार : परिवहन सेवेत सुधारणा करण्यात नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 23:17 IST

आपली बस प्रकल्पांतर्गत शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची शहर बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पाच ऑपरेटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या इन्टीग्रेटेड मल्टी मॉडेल ट्रान्झिट सिस्टम( डिम्टस्)कंपनी अपयशी ठरली आहे. करारातील तरतुदीनुसार बसची साफससफाई, सुरळीत बससेवा, कंडक्टरची भरती अपेक्षित होती. परंतु करारानुसार उत्तम दर्जाची बससेवा देण्यात अपयश आले आहे. यामुळे या कंपनीवर दंड आकारून वसूल केला जाणार आहे.

ठळक मुद्देचौकशीसाठी समिती गठित करण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपली बस प्रकल्पांतर्गत शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची शहर बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पाच ऑपरेटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या इन्टीग्रेटेड मल्टी मॉडेल ट्रान्झिट सिस्टम( डिम्टस्)कंपनी अपयशी ठरली आहे. करारातील तरतुदीनुसार बसची साफससफाई, सुरळीत बससेवा, कंडक्टरची भरती अपेक्षित होती. परंतु करारानुसार उत्तम दर्जाची बससेवा देण्यात अपयश आले आहे. यामुळे या कंपनीवर दंड आकारून वसूल केला जाणार आहे.गेल्या वर्षभरात बस कंडक्टर व चालकांनी अनेकदा संप पुकारले. कंडक्टरची नियुक्ती करण्याचा अधिकार असलेल्या डिम्टस् कंपनीला यावर वेळीच तोडगा काढण्यात अपयश आले. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले. गरजेनुसार कं डक्टरचा पुरवठा झाला नाही. बसेसची स्वच्छता नियमित होत नाही. नादुरुस्त बसचे प्रमाणही वाढले आहे. यासाठी दंड आकारण्यात आला आहे. तो योग्य की अयोग्य यासाठी समिती गठित केली जाणार असल्याची माहिती परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी दिली.परिवहन विभागाला वर्षभरात जवळपास ८० कोटीचा तोटा आहे. हा तोटा कमी करण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत वाढ करावी लागणार आहे. करारातही याचा समावेश आहे, सोबतच शहरात ४८७ बस संचालन करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ३२७ बसेस रस्त्यावर धावतात. यातील काही बसेस नादुरुस्त आहेत. ४८७ बसमधून दररोज १.५० प्रवाशांनी प्रवास न केल्यास तसेच बसची योग्य देखभाल न झाल्यास दंड आकारण्याची तरतूद असल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिली. त्यानुसार डिम्टस्वर २.८८ कोटींचा दंड आकारण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.प्रवाशांची संख्या वाढली नाही४८७ बसमधून दररोज १.५० लाख लोकांनी प्रवास करणे अपेक्षित होते. मात्र प्रवाशांची संख्या कमी आहे. परंतु प्रवासी संख्या कमी असल्याला जबाबदार धरताना एका बसमधून किती प्रवासी अपेक्षित होते त्यानुसार सुरू असलेल्या ३२७ बस मधून अपेक्षित प्रवासी प्रवास करीत नसल्याने डिम्टस्ला दंड आकारला जाणार आहे. जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला आहे. समितीच्या सूचनेनुसार दंड आकारला जाणार आहे.बसेस स्वच्छ नसल्यास दंडपरिवहन सेवेतील बसेस स्वच्छ ठेण्याची जबाबदारी डिम्टस् कंपनीवर आहे. परंतु डेपोच्या ठिकाणी डांबरीकरण वा खडीकरण नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात बसेस चिखलामुळे अस्वच्छ होतात. डेपोसाठी जागा उपलब्ध न होणे, इस्त्रो खाते न उघडणे यासाठी महापालिका जबाबदार आहे. दंड आकारताना अशा बाबी विचारात घेतल्या जातील.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर