शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सॅटेलाईट-ड्रोनद्वारे व्हावे नुकसानीचे पंचनामे : राम नेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 22:27 IST

अतिवृष्टी व अवकाळी (परतीच्या) पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे हे व्यक्तिश: (मॅन्युअली) न करता ही जुनाट पद्धत बंद करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन कॅमेरा, सॅटेलाईटच्या माध्यमातून हे पंचनामे करावेत, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सोमवारी पत्रपरिषदेद्वारे केली.

ठळक मुद्देजुनी पद्धत व्हावी बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टी व अवकाळी (परतीच्या) पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता शासनाकडून नुकसान भरपाईसाठी करण्यात येणाऱ्या पंचनाम्यांना विलंब होत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान भरपाईचा प्रश्न कायम आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने पंचनामे हे व्यक्तिश: (मॅन्युअली) न करता ही जुनाट पद्धत बंद करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन कॅमेरा, सॅटेलाईटच्या माध्यमातून हे पंचनामे करावेत, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सोमवारी पत्रपरिषदेद्वारे केली.पावसामुळे विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, धान, भाजीपाला, संत्रा, मोसंबी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व पिकांचे ८० टक्क्यापर्यंत नुकसान झाले आहे. त्यातच नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे अजून झाले नाही. शेतकऱ्यांना रब्बीसाठी शेती तयार करायची आहे. पंचनामेच झाले नाही तर आर्थिक नुकसान भरपाई मिळणार कधी? अशी एकूण परिस्थिती आहे. अलीकडे सर्वच गोष्टी ऑनलाईन करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. तेव्हा पंचनामेच का जुन्या पद्धतीने व्हावे. ड्रोन किंवा सॅटेलाईटने पंचनामे केल्यास प्रशासनाचा वेळ वाचेल व शेतकऱ्यांनाही योग्य लाभ मिळेल. मात्र, हे सर्व असताना सरकार जाणिवपूर्वक पंचनाम्याची जुनी पद्धत वापरत असल्याचा आरोपही नेवले यांनी केला.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेव्हा सरकारने या सर्व शेतकऱ्यांचे वीज बिलासह सर्व कर्ज सरसकट माफ करावे. याशिवाय शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही केली. पत्रपरिषदेला समितीचे अरुण केदार, गुलाबराव धांडे, शेखर काकडे, विजय मौंदेकर, अनिल केसरवाणी, मुकेश मासूरकर, विष्णू आष्टीकर, अण्णाजी राजेधर आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांना देणार सडका शेतीमाल भेटविदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे वेगवेगळी आंदोलने केली जातात. यातच नागपूर जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक सडले आहे. हा सडलेला शेतीमाल जिल्हधिकाऱ्यांमार्फत सरकारला भेट देऊन सरकार व प्रशासनाने लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधण्यासाठी येत्या ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोंब फुटलेल्या पिकांचे नमुने घेऊन निवडक शेतकरी आंदोलनात सहभागी होतील, असे नेवले यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळagricultureशेती