शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
4
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
5
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
6
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
9
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
10
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
11
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
12
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
13
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
14
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
15
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
16
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
17
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
18
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
19
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
20
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  

सॅटेलाईट-ड्रोनद्वारे व्हावे नुकसानीचे पंचनामे : राम नेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 22:27 IST

अतिवृष्टी व अवकाळी (परतीच्या) पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे हे व्यक्तिश: (मॅन्युअली) न करता ही जुनाट पद्धत बंद करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन कॅमेरा, सॅटेलाईटच्या माध्यमातून हे पंचनामे करावेत, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सोमवारी पत्रपरिषदेद्वारे केली.

ठळक मुद्देजुनी पद्धत व्हावी बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टी व अवकाळी (परतीच्या) पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता शासनाकडून नुकसान भरपाईसाठी करण्यात येणाऱ्या पंचनाम्यांना विलंब होत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान भरपाईचा प्रश्न कायम आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने पंचनामे हे व्यक्तिश: (मॅन्युअली) न करता ही जुनाट पद्धत बंद करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन कॅमेरा, सॅटेलाईटच्या माध्यमातून हे पंचनामे करावेत, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सोमवारी पत्रपरिषदेद्वारे केली.पावसामुळे विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, धान, भाजीपाला, संत्रा, मोसंबी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व पिकांचे ८० टक्क्यापर्यंत नुकसान झाले आहे. त्यातच नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे अजून झाले नाही. शेतकऱ्यांना रब्बीसाठी शेती तयार करायची आहे. पंचनामेच झाले नाही तर आर्थिक नुकसान भरपाई मिळणार कधी? अशी एकूण परिस्थिती आहे. अलीकडे सर्वच गोष्टी ऑनलाईन करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. तेव्हा पंचनामेच का जुन्या पद्धतीने व्हावे. ड्रोन किंवा सॅटेलाईटने पंचनामे केल्यास प्रशासनाचा वेळ वाचेल व शेतकऱ्यांनाही योग्य लाभ मिळेल. मात्र, हे सर्व असताना सरकार जाणिवपूर्वक पंचनाम्याची जुनी पद्धत वापरत असल्याचा आरोपही नेवले यांनी केला.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेव्हा सरकारने या सर्व शेतकऱ्यांचे वीज बिलासह सर्व कर्ज सरसकट माफ करावे. याशिवाय शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही केली. पत्रपरिषदेला समितीचे अरुण केदार, गुलाबराव धांडे, शेखर काकडे, विजय मौंदेकर, अनिल केसरवाणी, मुकेश मासूरकर, विष्णू आष्टीकर, अण्णाजी राजेधर आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांना देणार सडका शेतीमाल भेटविदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे वेगवेगळी आंदोलने केली जातात. यातच नागपूर जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक सडले आहे. हा सडलेला शेतीमाल जिल्हधिकाऱ्यांमार्फत सरकारला भेट देऊन सरकार व प्रशासनाने लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधण्यासाठी येत्या ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोंब फुटलेल्या पिकांचे नमुने घेऊन निवडक शेतकरी आंदोलनात सहभागी होतील, असे नेवले यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळagricultureशेती