शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

मुसळधार पावसामुळे संत्र्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : तालुक्यात झालेल्या मुसळधार व वादळी पावसामुळे संत्र्याचे अताेनात नुकसान झाले. तेलगाव शिवारात संत्र्याची झाडे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : तालुक्यात झालेल्या मुसळधार व वादळी पावसामुळे संत्र्याचे अताेनात नुकसान झाले. तेलगाव शिवारात संत्र्याची झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे लाखाेंचे नुकसान झाले. भाजीपाला पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. हातचा शेतमाल पावसाने हिरावून नेल्याने पुन्हा शेती करताना पैशाची जुळवाजुळव कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर उभा ठाकला आहे.

तेलगाव शिवारात खरीप पिकांसाेबतच कारली, दाेडके व इतर भाजीपाला पिके शेतकरी घेतात. तेलगाव येथील शेतकरी शंकर पेठे यांनी यावर्षी तीन एकरात कारली, दोडकी लागवड केली. पिकाच्या मशागतीवर बराच खर्चही केला. यातून येणाऱ्या उत्पादनातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची साेय हाेईल, अशी आशा असताना एकाच दिवसाच्या मुसळधार पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. तीन एकरातील वेलवर्गीय भाजीपाला तसेच शंकर पेठे व नीलेश ताजने यांच्या बागेतील १०० वर संत्रा झाडे उन्मळून पडली. यामुळे त्यांचे अंदाजे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.

मागील वर्षी काेराेनामुळे शेतमालाला पाहिजे तसा भाव मिळाला नाही. भाजीपाला मार्केट, चिल्लर भाजी विक्रीवर लावलेल्या निर्बंधांमुळे नगदी पीक म्हणून समजल्या जाणारा भाजीपाला कवडीमोल विकावा लागला. या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा गाडा कसाबसा चालवला. यंदा पुन्हा नव्याने शेतात राबविण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी झालेला तोटा यावर्षी भरून निघेल असे स्वप्न उराशी बाळगून जवळ असलेली जमापुंजी पुन्हा शेतात खर्च घातली. परंतु शेतातील पीक भुईसपाट झाल्याने आता नव्याने शेती करायची कशी असा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाकडून मिळणारी मदत हे नुकसान झालेल्या पिकाच्या तुलनेत अत्यल्प मिळत असल्याने झालेले नुकसान भरून निघणार नसल्याचे मतही शेतकरी शंकर पेठे यांनी व्यक्त केले.