शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

वन्य प्राण्यांमुळे काेवळ्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील काही भागात आधीच उंदरांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यातच हरीण ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्यातील काही भागात आधीच उंदरांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यातच हरीण व रानडुकरांचे कळप दाखल झाले असून, ते काेवळी पिके खाऊन फस्त करीत असून, नासाडीही करीत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी संकटात सापडले आहेत.

तालुक्यातील हिवरा, पाचगाव, खैरी (बिजेवाडा), चारगाव, मानापूर, नगरधन व लोहडोंगरी या शिवारात हरीण व रानडुकरांचे कळप दाखल झाले आहेत. एका कळपात किमान ५० हरीण व ३५ रानडुकरे असल्याची माहिती या भागातील शेतकऱ्यांनी दिली. या भागातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात सोयाबीन, कपाशी, तुरीची पेरणी केली असून, काहींनी धानाचे पऱ्हेही टाकले आहेत. ही पिके बऱ्यापैकी माेठी झाली आहेत तर पऱ्हे राेवणीयाेग्य झाले आहेत.

त्यातच हरणांचा कळप दिवसा तर रात्रीला रानडुकरांचा कळप शेतात येतात आणि काेवळी पिके खाऊन नुकसान करीत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. रानडुकरांचे शेतकरी व मजुरांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. या भागात आधीच उंदरांची संख्या भरमसाट असून, त्यात माकड, हरीण व रानडुकरांनी भर घातली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, या वन्यप्राण्यांचा कायम बंदाेबस्त करण्याची व पिकांची तातडीने याेग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी खैरी बिजेवाडा (ता. रामटेक) येथील जयदेव डडोरे, रूपचंद डडोरे, देवेंद्र डडोरे, देवचंद डडोरे, सुनील बरबटे, राजू बरबटे, हिवराहिवरी येथील अण्णा चाफले, कमलाकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

बंदाेबस्त करणार काेण?

हरीण व रानडुकरांसाेबतच माकडांचाही उपद्रव वाढला आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा वेळीच याेग्य बंदाेबस्त करण्याची मागणी वन अधिकाऱ्यांकडे अनेकदा केली. मात्र, कुणीही लक्ष देत नाही, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.या वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई तुटपुंजी दिली जात असून, ती मिळण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागते. त्याचे नियमही जटील आहेत. वन विभाग त्यांच्या वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.