शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागपूर जिल्ह्यात ५४,२०२ हेक्टरमध्ये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 10:29 IST

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन पिकांना बसला. संत्र्याचेही मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मदतीसाठी नव्याने आठ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाकरिता शेतकऱ्यांना धोरणानुसार मदत देण्यासाठी आणखी आठ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव नागपूर जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे.ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन पिकांना बसला. संत्र्याचेही मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. खरीप पिकांसाठी हेक्टरी ८ हजार तर फळपिकांना हेक्टरी १८ हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात ५४ हजार २०२ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले. यामुळे १ लाख १९ हजार ३५५ शेतकरी बाधित झाले. शासनाच्या निकषानुसार जिल्हा प्रशासनाने कोरडवाहूसाठी हेक्टरी ६ हजार ८०० व ओलित पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये प्रमाणे ४६ कोटी ८५ लाख रुपयाच्या निधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र शासनाने ओलित आणि कोरडवाहू असा प्रकारच रद्द करून सर्व प्रकारच्या शेतपिकांसाठी ८ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. कोरडवाहूचे क्षेत्र जास्त असल्याने निधीत वाढ झाली. त्यामुळे ८ कोटी रुपये अतिरिक्त देण्याच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे.

टॅग्स :agricultureशेती