शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नागपूर जिल्ह्यात ५४,२०२ हेक्टरमध्ये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 10:29 IST

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन पिकांना बसला. संत्र्याचेही मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मदतीसाठी नव्याने आठ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाकरिता शेतकऱ्यांना धोरणानुसार मदत देण्यासाठी आणखी आठ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव नागपूर जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे.ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन पिकांना बसला. संत्र्याचेही मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. खरीप पिकांसाठी हेक्टरी ८ हजार तर फळपिकांना हेक्टरी १८ हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात ५४ हजार २०२ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले. यामुळे १ लाख १९ हजार ३५५ शेतकरी बाधित झाले. शासनाच्या निकषानुसार जिल्हा प्रशासनाने कोरडवाहूसाठी हेक्टरी ६ हजार ८०० व ओलित पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये प्रमाणे ४६ कोटी ८५ लाख रुपयाच्या निधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र शासनाने ओलित आणि कोरडवाहू असा प्रकारच रद्द करून सर्व प्रकारच्या शेतपिकांसाठी ८ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. कोरडवाहूचे क्षेत्र जास्त असल्याने निधीत वाढ झाली. त्यामुळे ८ कोटी रुपये अतिरिक्त देण्याच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे.

टॅग्स :agricultureशेती