शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

नागपुरात  जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी लवकरच दहनघाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:03 IST

शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करता भांडेवाडी येथे जनावरांचा दहनघाट निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ठळक मुद्देभांडेवाडी येथे उभारणार ३.५० कोटींचा प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करता भांडेवाडी येथे जनावरांचा दहनघाट निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे.जानेवारी २०१६ मध्ये जनावरांच्या दहन घाटाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. स्थायी समितीने याला मंजुरी दिली होती. महापालिका आयुक्तांनी याला हिरवी झेंडी दिल्यानंतर प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. २०१७ मध्ये राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रस्तावाचा सर्वदृष्टीने विचार करण्यात आला. तांत्रिक सल्लागाराच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्याचा महापालिकेचा विचार आहे. पुढील काही दिवसात याबाबतच्या निविदा काढल्या जाणार आहे. निविदा मंजुरीनंतर कं त्राटदाराला भांडेवाडी येथे दहनघाट निर्माण करण्याबाबतचे कार्यादेश देण्यात येतील.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात जनावरांचा अत्याधुनिक दहनघाट उभारण्याच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानातून यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. भांडेवाडी येथे १८०० चौरस मीटर क्षेत्रात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. विजेवर चालणाºया इन्सिनिरेटर मशीनवर ३.५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पर्यावरण पूरक दहन घाटाचे निर्माण झाल्यानंतर मृत जनावरांना भांडेवाडी येथे जमिनीत पुरले जाणार नाही. मशीनच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जातील.नागपूर शहरात दररोज ४० ते ४५ जनावरे मरतात. यात काही पाळीव जनावरांचाही समावेश आहे. मृत जनावरांना भांडेवाडी येथे आणून त्याला जमिनीत पुरले जात होते. पावसाळ्याच्या दिवसात जनावरे मरण पावल्यास गोपलकांना पावसात खड्डा खोदून त्यावर अंतिम संस्कार करावे लागत होते. परंतु आता ही समस्या मिटणार आहे.भांडेवाडी येथे जागा शिल्लक नाहीशहरात दररोज ४० ते ४५ जनावरे मरण पावतात.जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी भांडेवाडी येथे दररोज खड्डे खोदावे लागतात. त्यामुळे आता येथे जागा शिल्लक राहिलेली नाही. पावसाळयाच्या दिवसात जनावरांवर अंतिम संस्कार करताना खड्डा खोदण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. तसेच आता येथे जागा शिल्लक राहिलेली नाही. भविष्याचा विचार करता जनावरांचा दहनघाट होणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका