शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नागपुरात  जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी लवकरच दहनघाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:03 IST

शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करता भांडेवाडी येथे जनावरांचा दहनघाट निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ठळक मुद्देभांडेवाडी येथे उभारणार ३.५० कोटींचा प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करता भांडेवाडी येथे जनावरांचा दहनघाट निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे.जानेवारी २०१६ मध्ये जनावरांच्या दहन घाटाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. स्थायी समितीने याला मंजुरी दिली होती. महापालिका आयुक्तांनी याला हिरवी झेंडी दिल्यानंतर प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. २०१७ मध्ये राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रस्तावाचा सर्वदृष्टीने विचार करण्यात आला. तांत्रिक सल्लागाराच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्याचा महापालिकेचा विचार आहे. पुढील काही दिवसात याबाबतच्या निविदा काढल्या जाणार आहे. निविदा मंजुरीनंतर कं त्राटदाराला भांडेवाडी येथे दहनघाट निर्माण करण्याबाबतचे कार्यादेश देण्यात येतील.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात जनावरांचा अत्याधुनिक दहनघाट उभारण्याच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानातून यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. भांडेवाडी येथे १८०० चौरस मीटर क्षेत्रात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. विजेवर चालणाºया इन्सिनिरेटर मशीनवर ३.५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पर्यावरण पूरक दहन घाटाचे निर्माण झाल्यानंतर मृत जनावरांना भांडेवाडी येथे जमिनीत पुरले जाणार नाही. मशीनच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जातील.नागपूर शहरात दररोज ४० ते ४५ जनावरे मरतात. यात काही पाळीव जनावरांचाही समावेश आहे. मृत जनावरांना भांडेवाडी येथे आणून त्याला जमिनीत पुरले जात होते. पावसाळ्याच्या दिवसात जनावरे मरण पावल्यास गोपलकांना पावसात खड्डा खोदून त्यावर अंतिम संस्कार करावे लागत होते. परंतु आता ही समस्या मिटणार आहे.भांडेवाडी येथे जागा शिल्लक नाहीशहरात दररोज ४० ते ४५ जनावरे मरण पावतात.जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी भांडेवाडी येथे दररोज खड्डे खोदावे लागतात. त्यामुळे आता येथे जागा शिल्लक राहिलेली नाही. पावसाळयाच्या दिवसात जनावरांवर अंतिम संस्कार करताना खड्डा खोदण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. तसेच आता येथे जागा शिल्लक राहिलेली नाही. भविष्याचा विचार करता जनावरांचा दहनघाट होणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका