शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नागपुरात  जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी लवकरच दहनघाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:03 IST

शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करता भांडेवाडी येथे जनावरांचा दहनघाट निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ठळक मुद्देभांडेवाडी येथे उभारणार ३.५० कोटींचा प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करता भांडेवाडी येथे जनावरांचा दहनघाट निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे.जानेवारी २०१६ मध्ये जनावरांच्या दहन घाटाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. स्थायी समितीने याला मंजुरी दिली होती. महापालिका आयुक्तांनी याला हिरवी झेंडी दिल्यानंतर प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. २०१७ मध्ये राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रस्तावाचा सर्वदृष्टीने विचार करण्यात आला. तांत्रिक सल्लागाराच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्याचा महापालिकेचा विचार आहे. पुढील काही दिवसात याबाबतच्या निविदा काढल्या जाणार आहे. निविदा मंजुरीनंतर कं त्राटदाराला भांडेवाडी येथे दहनघाट निर्माण करण्याबाबतचे कार्यादेश देण्यात येतील.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात जनावरांचा अत्याधुनिक दहनघाट उभारण्याच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानातून यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. भांडेवाडी येथे १८०० चौरस मीटर क्षेत्रात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. विजेवर चालणाºया इन्सिनिरेटर मशीनवर ३.५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पर्यावरण पूरक दहन घाटाचे निर्माण झाल्यानंतर मृत जनावरांना भांडेवाडी येथे जमिनीत पुरले जाणार नाही. मशीनच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जातील.नागपूर शहरात दररोज ४० ते ४५ जनावरे मरतात. यात काही पाळीव जनावरांचाही समावेश आहे. मृत जनावरांना भांडेवाडी येथे आणून त्याला जमिनीत पुरले जात होते. पावसाळ्याच्या दिवसात जनावरे मरण पावल्यास गोपलकांना पावसात खड्डा खोदून त्यावर अंतिम संस्कार करावे लागत होते. परंतु आता ही समस्या मिटणार आहे.भांडेवाडी येथे जागा शिल्लक नाहीशहरात दररोज ४० ते ४५ जनावरे मरण पावतात.जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी भांडेवाडी येथे दररोज खड्डे खोदावे लागतात. त्यामुळे आता येथे जागा शिल्लक राहिलेली नाही. पावसाळयाच्या दिवसात जनावरांवर अंतिम संस्कार करताना खड्डा खोदण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. तसेच आता येथे जागा शिल्लक राहिलेली नाही. भविष्याचा विचार करता जनावरांचा दहनघाट होणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका