शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

पोलीस ठाण्यातही दाखल होतील सायबरशी संबंधित गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 19:46 IST

Nagpur News शहरात सायबर गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असून, यापुढे सायबरशी संबंधित सर्व तक्रारींवर प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

ठळक मुद्दे सायबर पोलीस ठाण्याच्या स्वतंत्र इमारतीचे पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर : शहरात सायबर गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असून, यापुढे सायबरशी संबंधित सर्व तक्रारींवर प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

सदरच्या छावणी येथील पटेल बंगल्यातील सायबर पोलीस स्टेशनच्या स्वतंत्र इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त नी जैन, उपायुक्त (गुन्हे) चिन्मय पंडित, उपायुक्त डॉ. संदीप पखाले, उपायुक्त गजानन राजमाने, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबरशी संबंधित गुन्हे दाखल होतील. सोबतच तक्रारकर्ता सायबर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून तक्रार करीत असल्यास त्याची तक्रारही सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येईल. कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांचे नोडल ऑफिसर संबंधित तपास अधिकाऱ्यास मदत करतील.

काही दिवसांपूर्वी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक सहायक पोलीस निरीक्षक, हवालदार आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह एक सायबर सेल गठीत करण्यात आला आहे. महिलांच्या फेसबुक व सोशल मीडियावर बदनामीच्या तक्रारी संबंधित ठाण्यात दाखल होतील. ऑनलाइन सायबर पोर्टलवर २ हजार तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचा निपटारा ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत होणे अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. संचालन सहायक पोलीस निरीक्षक अमोल दौंड यांनी केले. आभार सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी लोखंडे यांनी मानले.

सायबर इंटेलिजन्स युनिटची स्थापना

- सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी सायबर इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. या युनिटच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपप्रचार करणाऱ्या सायबर गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. एखाद्या महिलेविरुद्ध आपत्तीजनक संदेश व्हायरल करणारे कायद्याचे उल्लंघन करून मॅसेज प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. हे युनिट सोशल मिडिया लॅबअंतर्गत काम करणार आहे.

गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा

- पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, गेल्या २० वर्षांच्या तुलनेत गुन्हेगारी घटना कमी करण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश मिळाले आहे. यानुसार खुनाच्या घटना ३० टक्के कमी झाल्या आहेत. तर हल्ल्याच्या घटना ३८ टक्के, शासकीय कामात अडथळा आणण्याच्या घटना ४५ टक्के आणि बलात्काराच्या घटना ५ टक्के कमी झाल्या आहेत. बलात्काराच्या घटनात ९९ टक्के घटना पीडितेच्या ओळखीच्या आणि नातेवाइकांकडून झाल्याचे त्यांनी सांगितले.

...............

टॅग्स :Policeपोलिस