शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नागपुरात सुरू होणार सायबर पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 22:54 IST

नागपुरात झपाट्याने वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यासाठी सायबर पोलीस ठाणे मंजूर झाले आहे. पुढच्या आठवड्यात हे पोलीस ठाणे कार्यरत होऊ शकते, अशी शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देमनुष्यबळ निश्चित : पोलिस निरीक्षकांसह ७४ अधिकारी कर्मचारी काम करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात झपाट्याने वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यासाठी सायबर पोलीस ठाणे मंजूर झाले आहे. पुढच्या आठवड्यात हे पोलीस ठाणे कार्यरत होऊ शकते, अशी शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.नागपुरात गेल्या काही दिवसापासून सायबर गुन्हेगारी कमालीची वाढली आहे. रोज नवनव्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. गुन्हे शाखेत सायबर सेल आहे. मात्र सायबर सेलला स्वतंत्र अधिकार आणि मनुष्यबळ नसल्याने या गुन्ह्यांना आळा घालण्यात अडसर निर्माण झाला आहे. ते लक्षात घेऊन नागपुरात सायबर पोलीस स्टेशन सुरू करावे, असा मागणीवजा प्रस्ताव पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पोलीस महासंचालनालयाकडे पाठविला होता. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली असून मनुष्यबळही निश्चित झाले आहे. त्यानुसार नागपूरच्या सायबर पोलीस ठाण्यासाठी ४ पोलीस निरीक्षक, ९ सहायक निरीक्षक, ३ उपनिरीक्षक, ३ सहायक उपनिरीक्षक, १२ हवालदार १५ नायक, २६ पोलीस शिपाई आणि २ वाहन चालक अशी एकूण ७४ पदे मंजूर करण्यात आली आहेत.गुन्हे शाखेतून होणार नियंत्रितगुन्हे शाखेतील एक सहाय्यक पोलीस आयुक्त या सायबर पोलिस ठाण्याला नियंत्रित करणार आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त परिमंडळ अधिकारी म्हणून आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रादेशिक विभाग प्रमुख म्हणून या पोलिस ठाण्याच्या कारभारावर नियंत्रण ठेवणार आहेत. शहरातील ३२ ही पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र या सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारात राहणार आहे.गुन्हे शाखेत सुरू होणारसध्या गुन्हे शाखेच्या इमारतीत सायबर शाखेचा कारभार सुरू आहे. तेथे अत्याधुनिक यंत्रणा लावण्यात आली आहे. केवळ पोलिस ठाण्याचा फलक तेवढा लावणे बाकी आहे. हा फलक लावण्यासोबतच येथील ठाणेदार म्हणून येत्या चार ते पाच दिवसात पोलीस आयुक्त संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहेत. पुढच्या आठवड्यात सायबर ठाण्याचा कारभार सुरू होईल, असे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPolice Stationपोलीस ठाणे