शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

झाडे कापून कागद निर्मिती होते, हा भ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:48 IST

झाडे कापूनच कागद निर्मिती केली जाते आणि त्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास होतो, हा गैरसमज लोकांमध्ये अनेक वर्षांपासून पसरविला गेला आहे. वास्तविक उपयोगात येणारा ७० टक्के कागद हा पुनर्प्रक्रियेतून निर्माण केला जातो. त्यामुळे लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी आणि जनजागृतीसाठी नागपूर पेपर ट्रेडर्स असोसिएशनतर्फे १ आॅगस्ट हा दिन राष्ट्रीय पेपर दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष असीम बोरडिया यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.

ठळक मुद्देकागद उद्योजक १ आॅगस्टला साजरा करणार राष्ट्रीय पेपर दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झाडे कापूनच कागद निर्मिती केली जाते आणि त्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास होतो, हा गैरसमज लोकांमध्ये अनेक वर्षांपासून पसरविला गेला आहे. वास्तविक उपयोगात येणारा ७० टक्के कागद हा पुनर्प्रक्रियेतून निर्माण केला जातो. त्यामुळे लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी आणि जनजागृतीसाठी नागपूर पेपर ट्रेडर्स असोसिएशनतर्फे १ आॅगस्ट हा दिन राष्ट्रीय पेपर दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष असीम बोरडिया यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.१ आॅगस्ट १९४० रोजी पुणे येथे देशातील पहिली पेपर मिल के.बी. जोशी यांनी सुरू केली होती व पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्याचे उद्घाटन केले होते. याचे स्मरण म्हणून हा दिवस असोसिएशनतर्फे निवडण्यात आल्याचे बोरडिया यांनी सांगितले. याअंतर्गत १ आॅगस्टला गणेशपेठ पोलीस स्टेशनपासून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शहरातील विविध मार्गाने फिरून त्याच ठिकाणी समारोप होईल. यानंतर पुढेही जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असून देशभरात याबाबत प्रसार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले, भारतात उपयोगात येणारा ३५ टक्के कागद वेस्ट पेपरमधूनच निर्माण केला जातो. याशिवाय ४२ टक्के कागद कृषी वेस्टमधून तयार केला जातो. केवळ ३२ टक्के कागद बांबू आणि इतर लाकडापासून तयार केला जातो व यातील बहुतेक पल्प इंडस्टीमधून आयात केला जातो. शिवाय देशातील कागद उद्योजक पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जबाबदारी म्हणून वृक्षारोपणासाठी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.देशात ३२० च्या आसपास पेपर मिल असून त्यातील केवळ ३० ते ३२ मिल या झाडांच्या लगद्यावर अवलंबून आहेत. शिवाय कागद पूर्णपणे नष्ट होणारी गोष्ट आहे, त्यामुळे ती पर्यावरणासाठी हानीकारक अजिबात नाही. कागद आणि प्लास्टिक यांची तुलना केली जाऊ शकत नाही, असेही बोरडिया यांनी आवर्जून नमूद केले. त्यामुळे कागदामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, हा निव्वळ भ्रम असून याबाबत उद्योजकांसह शाळा-महाविद्यालये व नागरिकांमध्ये जागृती करण्याचे अभियान राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला असोसिएशनचे सचिव पीयूष फत्तेपुरिया, माजी अध्यक्ष महेश खंडेलवाल, विजय खंडेलवाल, उपाध्यक्ष दिलीप जैन, सुशील केयाल आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :nagpurनागपूर