शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

शीर आणि हातपाय कापलेले पोतेही मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:19 IST

निर्दयपणे कापून पोत्यात भरलेले शरीराचे दुसरे अवयवही गांधीसागर तलावाच्या काठावर गुरुवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना आढळले. शहारे आणणाऱ्या या हत्याकांडाने पोलीस दलही हादरले असून, हा तरुण कोण आणि त्याची एवढ्या निर्दयपणे कुणी हत्या केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सीसीटीएनएसमधून नागपूर शहर आणि ग्रामीण भागासोबतच विदर्भातील ठिकठिकाणच्या जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे.

ठळक मुद्देसर्वत्र थरार, मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरूसीसीटीएनएसमधून काढला बेपत्ता तरुणांचा डाटाविदर्भातील सर्वच पोलीस ठाण्यांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निर्दयपणे कापून पोत्यात भरलेले शरीराचे दुसरे अवयवही गांधीसागर तलावाच्या काठावर गुरुवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना आढळले. शहारे आणणाऱ्या या हत्याकांडाने पोलीस दलही हादरले असून, हा तरुण कोण आणि त्याची एवढ्या निर्दयपणे कुणी हत्या केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सीसीटीएनएसमधून नागपूर शहर आणि ग्रामीण भागासोबतच विदर्भातील ठिकठिकाणच्या जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे.गांधीसागर तलावात बुधवारी रात्री पोत्यात बांधलेले धड मिळाले होते. शरीराचे अन्य अंग गायब असल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली होती. गणेशपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, एका पोत्यात धड आढळले त्यामुळे शीर आणि इतर अवयव त्याच भागात असावे, असा अंदाज बांधून पोलिसांनी शोधाशोध केली असता, गुरुवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना दुसरे एक पोते आढळले. त्यात तरुणाचे शीर आणि इतर अवयव होते. डॉक्टरांच्या मदतीने पोलिसांनी ते सर्व अवयव जोडून त्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार, मृतक अंदाजे ३० वर्षांचा असावा, त्याचा वर्ण मध्यम गोरा, बारीक दाढी आणि मिशी काढलेली असल्याचे पोलीस सांगतात.दरम्यान, या थरारक हत्याकांडाने पोलिसही हादरले आहेत. प्रकरणाची माहिती कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन सीसीटीएनएसच्या माध्यमातून नागपूर-विदर्भातील अनेक ठिकाणच्या बेपत्ता तरुणांची माहिती पोलिसांनी आज संकलित केली. त्यांच्यातून नमूद वर्णनाचा तरुण कोण, त्याची पडताळणी पोलीस करीत आहेत. ज्या पोत्यात मृतदेहाचे तुकडे आढळले, त्या पोत्यावर आढळलेल्या काही मजकुरांवरून पोलिसांनी व्यापाऱ्यांकडे चौकशी चालविली आहे.अट्टल गुन्हेगारांचे कृत्यमृताची ओळख पटल्यानंतर आरोपींचा छडा लावणे सोपी होणार आहे. एवढ्या निर्दयपणे हत्या करून शरीराचे तुकडे करणे, ते वेगवेगळ्या पोत्यात भरणे आणि नंतर त्याची अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणे, सामान्य गुन्हेगारासाठी शक्य नाही. आरोपी अनेक असावेत, ते सराईत गुन्हेगार असावे आणि अनैतिक प्रकरणाची या हत्येला जोड असावी, असा तर्क बांधून पोलिसांनी चौकशीचे चक्र फिरविले आहे. अनैतिक संबंधातून हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून एका पोत्यात भरून फेकल्याची घटना यापूर्वी सीताबर्डीत उघडकीस आली होती.

टॅग्स :MurderखूनGandhi Sagarगांधीसागर