शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शीर आणि हातपाय कापलेले पोतेही मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:19 IST

निर्दयपणे कापून पोत्यात भरलेले शरीराचे दुसरे अवयवही गांधीसागर तलावाच्या काठावर गुरुवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना आढळले. शहारे आणणाऱ्या या हत्याकांडाने पोलीस दलही हादरले असून, हा तरुण कोण आणि त्याची एवढ्या निर्दयपणे कुणी हत्या केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सीसीटीएनएसमधून नागपूर शहर आणि ग्रामीण भागासोबतच विदर्भातील ठिकठिकाणच्या जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे.

ठळक मुद्देसर्वत्र थरार, मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरूसीसीटीएनएसमधून काढला बेपत्ता तरुणांचा डाटाविदर्भातील सर्वच पोलीस ठाण्यांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निर्दयपणे कापून पोत्यात भरलेले शरीराचे दुसरे अवयवही गांधीसागर तलावाच्या काठावर गुरुवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना आढळले. शहारे आणणाऱ्या या हत्याकांडाने पोलीस दलही हादरले असून, हा तरुण कोण आणि त्याची एवढ्या निर्दयपणे कुणी हत्या केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सीसीटीएनएसमधून नागपूर शहर आणि ग्रामीण भागासोबतच विदर्भातील ठिकठिकाणच्या जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे.गांधीसागर तलावात बुधवारी रात्री पोत्यात बांधलेले धड मिळाले होते. शरीराचे अन्य अंग गायब असल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली होती. गणेशपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, एका पोत्यात धड आढळले त्यामुळे शीर आणि इतर अवयव त्याच भागात असावे, असा अंदाज बांधून पोलिसांनी शोधाशोध केली असता, गुरुवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना दुसरे एक पोते आढळले. त्यात तरुणाचे शीर आणि इतर अवयव होते. डॉक्टरांच्या मदतीने पोलिसांनी ते सर्व अवयव जोडून त्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार, मृतक अंदाजे ३० वर्षांचा असावा, त्याचा वर्ण मध्यम गोरा, बारीक दाढी आणि मिशी काढलेली असल्याचे पोलीस सांगतात.दरम्यान, या थरारक हत्याकांडाने पोलिसही हादरले आहेत. प्रकरणाची माहिती कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन सीसीटीएनएसच्या माध्यमातून नागपूर-विदर्भातील अनेक ठिकाणच्या बेपत्ता तरुणांची माहिती पोलिसांनी आज संकलित केली. त्यांच्यातून नमूद वर्णनाचा तरुण कोण, त्याची पडताळणी पोलीस करीत आहेत. ज्या पोत्यात मृतदेहाचे तुकडे आढळले, त्या पोत्यावर आढळलेल्या काही मजकुरांवरून पोलिसांनी व्यापाऱ्यांकडे चौकशी चालविली आहे.अट्टल गुन्हेगारांचे कृत्यमृताची ओळख पटल्यानंतर आरोपींचा छडा लावणे सोपी होणार आहे. एवढ्या निर्दयपणे हत्या करून शरीराचे तुकडे करणे, ते वेगवेगळ्या पोत्यात भरणे आणि नंतर त्याची अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणे, सामान्य गुन्हेगारासाठी शक्य नाही. आरोपी अनेक असावेत, ते सराईत गुन्हेगार असावे आणि अनैतिक प्रकरणाची या हत्येला जोड असावी, असा तर्क बांधून पोलिसांनी चौकशीचे चक्र फिरविले आहे. अनैतिक संबंधातून हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून एका पोत्यात भरून फेकल्याची घटना यापूर्वी सीताबर्डीत उघडकीस आली होती.

टॅग्स :MurderखूनGandhi Sagarगांधीसागर