शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कोळसा संकटावर सध्या ‘ब्रेक’; वीज केंद्रांमध्ये वाढला साठा; पुरवठ्यातही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 07:15 IST

Nagpur News परळीसोडून इतर वीज केंद्रातील कोळसा साठा अजूनही संवेदनशील स्थितीत आहे. परंतु परिस्थिती सुधारत असल्याने वीज केंद्र लवकरच यातूनही बाहेर येईल, असा महाजेनकोचा दावा आहे.

कमल शर्मा

नागपूर : मान्सून सुरू होताच राज्यातील औष्णिक वीज केंद्रासमोर उभे ठाकलेले कोळशाचे संकट सध्यातरी टळले आहे. परळीसोडून इतर वीज केंद्रातील कोळसा साठा अजूनही संवेदनशील स्थितीत आहे. परंतु परिस्थिती सुधारत असल्याने वीज केंद्र लवकरच यातूनही बाहेर येईल, असा महाजेनकोचा दावा आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, टळलेले संकट हे तात्पुरते आहे. पुढील मान्सूनमध्ये ही समस्या होऊ नये म्हणून महाजेनकोला आतापासूनच पाऊल उचलावे लागेल.

राज्यातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा साठा अतिशय कमी झाला होता. १२ पेक्षा अधिक वीज युनिटमधील उत्पादन थांबले होते. पॉवर एक्सचेंजमधून १५ रुपये प्रति युनिटच्या दराने वीज खरेदी करून पुरवठा करण्याची वेळ आली होती. परंतु सध्या राज्यातील परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे. अजूनही पाच युनिट बंद आहेत, मात्र ते कोळशामुळे नाहीत. महाजेनकोचे म्हणणे आहे की, कोळसा खाणीमध्ये पाणी जमा झाल्याने पुरवठा प्रभावित झाला होता. पाऊस थांबताच कोळशाचा पुरवठाही पुन्हा वाढला आहे. पुरवठा वाढल्याने खाणीतून सायडींगपर्यंत कोळसा आणण्याची जबाबदारी आरसीआर (रस्ते व रेल्वे) वाहतुकीच्या माध्यमातून महाजेनकोने स्वत: उचलली आहे. यामुळे खर्च वाढला मात्र कोळशाचा पुरवठा व्यवस्थित झाला. आता वीज केंद्रांमध्ये २ लाख ६० हजार मेट्रिक टनपेक्षा अधिकचा कोळसा साठा आहे. पूर्व तो २ लाख मेट्रिक टन इतका होता.

दर दहाव्या दिवशी २०० कोटी

कोळसा पुरवठ्यात सुधारणा व्हावी, यासाठी महाजेनको आता कोळशाची थकीत रक्कम अदा करण्यासही प्राधान्य देत आहे. २५०० कोटीची थकबाकी चुकविण्यासाठी कंपनी दर दहाव्या दिवशी वेकोलिसह इतर कोळसा कंपन्यांना २०० कोटी रुपयाचे देणे देत आहे.

वीज केंद्र - इतक्या दिवसाचा साठा

कोराडी (६६०) - १

कोराडी (२१०) -१.५

नाशिक - २

भुसावळ - १.५

परळी - ४.२५

पारस - ३

चंद्रपूर - १.२५

खापरखेडा - १.५

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकट