शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रिपोर्टसाठी केंद्रावर गर्दी, संक्रमणाचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोविड प्रकोप थांबताना दिसत नाही. पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१ हजारांच्या पुढे गेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोविड प्रकोप थांबताना दिसत नाही. पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१ हजारांच्या पुढे गेली आहे. दररोज सहा ते सात हजार रुग्णांची भर पडत आहे. वाढत्या रूग्णांसोबतच आरटीपीसीआर व अ‍ँटिजेन टेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दररोज २६ ते २७ हजारापर्यंत हा आकडा गेला आहे. चाचणी करणारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने लॅबकडून वेळेवर रिपोर्ट मिळत नाही. मोबाईलवर मेसेज न आल्याने रिपोर्टची चौकशी करण्यासाठी केंद्रावर लोकांची गर्दी वाढली आहे. यातून संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोराेनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात बाधितांची संख्या वाढली. एप्रिल महिन्यात प्रकोप आणखी वाढला. गृह विलगीकरणातील रूग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. संसर्ग टाळण्यासाठी बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची वेळीच चाचणी होणे गरजेचे आहे. यामुळे चाचणी केंद्रासोबतच लॅब वरील कामाचा भार वाढला आहे. शासकीय रूग्णालयात रिपोर्ट मिळण्याला तीन -चार दिवस लागतात. पॉझिटिव्ह आहे की नाही याची खात्री होईपर्यंत बाधितांचा मुक्त संचार सुरू आहे. तपासणी करणाऱ्यांत २५ टक्के बाधित येत आहेत. यामुळे रिपोर्टच्या चौकशीसाठी होणाऱ्या गर्दीतही बाधित असल्याने संक्रमण वाढत आहे. मनपा प्रशासन वाढत्या रूग्णसंख्येमुळे हतबल झाले आहे. त्यात कान्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने ही प्रक्रिया जवळपास ठप्पच आहे.

.....

खासगी लॅबमध्ये आठवड्यानंतर रिपोर्ट

शासकीय रूग्णालय व मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रावर होणारी गर्दी विचारात घेता खासगी लॅबमध्ये चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु खासगी लॅबचा रिपोर्ट सात-आठ दिवसानंतर मिळत आहे. रिपोर्ट नसल्याने वेळीच उपचार करता येत नाही. रिपोर्टच्या प्रतीक्षेत प्रकृती गंभीर होण्याचे प्रकार वाढले आहे. उशिराने औषधोपचार सुरू झाल्याने अनेकांचा जीव धोक्यात आला आहे.

....

हॉटस्पॉट भागातही रिपोर्ट उशिराच

हनुमाननगर, लक्ष्मीनगर, मंगळवारी,धरमपेठ, नेहरूनगर व धंतोली झोन भागात सर्वाधिक हॉटस्पॉट आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी होणे गरजेचे आहे. चाचणी रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळणे अपेक्षित आहे. परंतु रिपोर्ट उशिरा मिळतो. यादरम्यान संबंधित व्यक्तीला लक्षणे नसल्याने तो सर्वत्र भटकंती करतो. अशा व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.