शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेमुळे कंपन्या मालामाल; शेतकरी कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 12:07 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा करणारे सरकार प्रत्यक्षात प्रधानमंत्री फसल बिमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना नागवून विमा कंपन्यांची झोळी भरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्दे १० विमा कंपन्यांना दरवर्षी १०,००० कोटी नफा

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा करणारे सरकार प्रत्यक्षात प्रधानमंत्री फसल बिमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना नागवून विमा कंपन्यांची झोळी भरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.विशेष म्हणजे प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या अहवालातच ही बाब स्पष्ट झाली आहे. राष्ट्रीय किसान समन्वय समितीचे संयोजक विवेकानंद माथने यांनी या अहवालातील जी आकडेवारी सादर केली ती धक्कादायक आहे.

आकडेवारी काय सांगते?वर्ष २०१६-१७ मध्ये ५.७५ कोटी शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा काढण्यात आला. त्यासाठी विमा कंपन्यांना तब्बल २२,१८० कोटी प्रीमियम व राज्य/ केंद्र शासनाच्या अनुदानापोटी मिळाले. त्यावर्षी पीक विम्याचे एकूण १२,९४८ कोटीचे दावे विमा कंपन्यांनी मंजूर केले. त्यामुळे विमा कंपन्यांना ९,२३२ कोटी लाभ झाला.असाच प्रकार २०१७-१८ या वर्षातही घडण्याची शक्यता आहे. ५.१६ कोटी शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा काढला गेला आहे व त्यासाठी विमा कंपन्यांना २४,७१० कोटी दिले आहेत. यापैकी खरीप २०१७ साठी विमा कंपन्यांनी १८ जूनपर्यंत ८७२४ कोटींचे दावे मंजूर केले आहे. रबी हंगामाचे दावे ६००० कोटी होतील हे मान्य केले तरी यावर्षीही एकूण दावे १४,००० कोटीचे असण्याची व त्याद्वारे विमाकंपन्यांना १०,००० कोटी नफा होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाबतीतही २०१६-१७ मध्ये असाच प्रकार घडला आहे. त्यावर्षी ८२.७३ लाख शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी विमा कंपन्यांना ३,६२२.११ कोटी दिले. विमा कंपन्यांनी २१६२.४७ कोटींचे दावे मंजूर केले व १४६० कोटी नफा कमावला आहे. २०१७-१८ची महाराष्ट्राची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.याबाबतीत राष्ट्रीय किसान समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व नीती आयोग यांची भेट घेऊन ही योजना बंद करून त्याऐवजी सरळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली अशी माहिती माथने यांनी दिली.मजेची बाब म्हणजे प्रधानमंत्री फसल बिमा योजना २०१६ साली आली आणि दोन वर्षात तिचा फज्जा उडालेला आहे. विशेष म्हणजे पंजाब सरकारने ही योजना लागू केलीच नाही तर बिहार सरकारने ही योजना यावर्षीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.यावर्षीच्या बजेटमध्ये केंद्र सरकारने कृषी योजनांसाठी ४६,७०० कोटी ठेवले आहेत. त्यापैकी १३,००० कोटी या पीक विमा योजनेसाठी आहेत. ही रक्कम अंतत: कुणाला मिळणार आहे हे उघड आहे.योजना काय आहेप्रधानमंत्री फसल बिमा योजनेमध्ये विम्याचे प्रीमियम शेतकऱ्यांच्या पीककर्जातून कापले जाते. याशिवाय या योजनेसाठी राज्य व केंद्र सरकारही अनुदान देते. ही सर्व राशी विमा कंपन्यांना मिळते व त्यातून पिकाचे नुकसान झाले तर विमा दाव्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. या गोरखधंध्यात विमा कंपन्या दरवर्षी १०,००० कोटीच्या जवळपास नफा कमवत आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती