शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

नागपूर जिल्ह्यात विद्युत टॉवरमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 10:54 IST

कळमेश्वर तालुक्यातील काही भागात खासगी वीजनिर्मिती कंपनीच्यावतीने टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देखैरी शिवारातील प्रकार पूर्वसूचना न देता कामाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमेश्वर तालुक्यातील काही भागात खासगी वीजनिर्मिती कंपनीच्यावतीने टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. या कंपनीने खैरी (हरजी) शिवारात संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोणतीही तोंडी अथवा लेखी पूर्वसूचना संबंधित शेतकऱ्यांना न देता त्यांच्या शेतात टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात केली. यात पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावर अधिकारी असंबद्ध उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतातील टॉवरमुळे शेतांची किंमत कमी होत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली.परिणामी, पोलीस व महसूल विभागाने या संपूर्ण प्रकाराची पाहणी करावी आणि संबंधित शेतकऱ्यांना कंपनीकडून बाजारभावाप्रमाणे नुकसानभपाई मिळवून द्यावी तसेच शेतातील टॉवरच्या जागेचा मोबदला देण्यात यावा, मोबदला व नुकसानभरपाई मिळेपर्यंत काम बंद ठेवावे, शेतात ठेवण्यात आलेले टॉवरचे साहित्य तत्काळ उचलावे अशी मागणी दिलीप राऊत, नारायण बन्सोड, राहुल आंबोले, प्रभाकर आंबोले, सुभाष खंडागळे, जावेद शेख, तानाजी बावणे, झिंगूजी गोंड, सुधाकर भापकर, छत्रपती बुरबुरे, अनिल गोडे, राजेश तिडले, मनीष शेंडे, गणेश चिखले, हमीदा शेख, प्रमोद भापकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली असून, कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी