शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

ही तर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून केलेली टीका : श्रीपाद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:28 IST

साहित्य महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या कार्यप्रणालीवर टीका केल्यानंतर डॉ. जोशी यांनीही पलटवार केला. महामंडळाचे तीन वर्षे चाललेले कार्य महामंडळाच्या घटनादत्त तरतुदीनुसार आणि समाविष्ट, घटक व संलग्न संस्थांच्या सर्वसंमतीने चालले आहे, पण काहींना हेच अडचणीचे जात असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लावला. इतर सर्व संस्थांचे सहकार्य लाभले असताना, नाव न घेता त्यांच्याच संस्थेने सहकार्य केले नसल्याचा आरोप केला. केवळ पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन व पश्चातबुद्धीने ही टीका करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ठळक मुद्देठाले-पाटलांवर पलटवार : महामंडळाच्या घटनादत्त कार्याचा नीट अभ्यास करावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्य महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या कार्यप्रणालीवर टीका केल्यानंतर डॉ. जोशी यांनीही पलटवार केला. महामंडळाचे तीन वर्षे चाललेले कार्य महामंडळाच्या घटनादत्त तरतुदीनुसार आणि समाविष्ट, घटक व संलग्न संस्थांच्या सर्वसंमतीने चालले आहे, पण काहींना हेच अडचणीचे जात असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लावला. इतर सर्व संस्थांचे सहकार्य लाभले असताना, नाव न घेता त्यांच्याच संस्थेने सहकार्य केले नसल्याचा आरोप केला. केवळ पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन व पश्चातबुद्धीने ही टीका करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे विर्दी साहित्य संघाकडे असलेले कार्यालय मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादकडे हस्तांतरित झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारताच प्रा. कौतिकराव यांनी डॉ. जोशी एकाधिकारशाहीने कारभार चालवित असल्याचा आरोप केला होता. संमेलन अध्यक्षांची निवडणूक रद्द करण्यासह बाहेरील संस्थांना स्थान देण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत डॉ. जोशी आपलाच तोरा चालवित होते, असा आरोप केला. महामंडळाला मिळालेली देणगी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवू, असेही ठाले-पाटील बोलले. त्यावर उत्तर देताना डॉ. श्रीपाद जोशी यांनी ‘महामंडळाच्या कार्याचा नीट अभ्यास करा’, अशी उपरोधिक सूचना केली. ते म्हणाले की, महामंडळ पुण्याकडे असताना प्राप्त देणगीचा विनियोग कसा करायचा याबाबत महामंडळाने ठराव करून जो निर्णय घेतला होता त्याचे पालन महामंडळाच्या घटक, समाविष्ट व संलग्न अशा महाराष्ट्रातील व महाराष्ट्राला बाहेरील मिळून एकूण दहा संस्थांपैकी नऊ संस्थांनी गेले तीन वर्षे केले. त्यामुळेच महामंडळाला विविध कार्यशाळा, शिबिरे ,बहुभाषिक मेळावे, लेखक मेळावे, असे कार्य करता आले. एवढेच नव्हे तर तसे करणे ठरावानुसार बंधनकारकच असल्याने महामंडळाचे कार्यवाह व कार्यालय यांचे काम अंमल तेवढा करण्याचे असते. विदर्भाकडे असताना महामंडळाने ठरावानुसारच त्या देणगीचा विनियोग केल्याने महामंडळाला लाभच झालेला असल्याचे ते म्हणाले.कोणत्याही संस्थेचे कार्य विशिष्ट पदावरील विशिष्ट व्यक्तीच्या मताने नव्हे तर संस्थेच्या घटनात्मक ठरावानुसार व संमत अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार चालत असते. साहित्य महामंडळ ही संस्थासुद्धा धर्मादाय कायद्यानुसार नोंदणीकृत संस्था आहे व घटनेत नमूद ठरावानुसार तिचे कार्ये चालतात. ही कार्ये जर कुणी नीट वाचली नसतील तर पुन: वाचली पाहिजेत, अशी उपरोधिक सूचनाही त्यांनी दिली. केवळ संमेलन घेणे हे महामंडळाचे एकमेव कार्य नमूद नाही. ते अनेक कार्यापैकी एक आणि क्रमांक तीनवर नमूद एक कार्य आहे. एखाद्या विशिष्ट संस्थेकडे असलेले महामंडळ कार्यालय त्या मर्यादित कार्यकाळात  त्याला सोपवलेली ही अनेक घटनादत्त कार्ये निष्ठेने व समर्थपणे पार पाडते हेच काही विशिष्ट लोकांना अडचणीचे ठरत असल्याचा आरोप डॉ. जोशी यांनी केला. ही त्यांची व्यक्तिगत मते असू शकतात, घटनात्मक व संस्थात्मक वास्तव नव्हे, असेही ते म्हणाले. महामंडळाने त्याचे सोपवलेले घटनात्मक कार्य विस्तारण्याची गरजच जर वाटत नसेल तर या महामंडळाच्या निर्मितीचे प्रयोजनच चुकले आहे काय किंवा आता त्याची गरजच वाटेनाशी झाली आहे काय, असा सवाल त्यांनी केला. मग आयकर कोण भरेल?महामंडळाला मिळणारी देणगी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवू असे कौतिकराव सांगत असले तरी पुण्यात झालेल्या ठरावानुसार ते शक्य नाही. हा निधी कार्य करण्यासाठी मिळतो ठेवण्यासाठी नाही. आणि ठेवलाच तर त्यावर येणारा आयकर कोण भरेल, असा सवाल महामंडळाच्या एका माजी सदस्याने केला आहे. महामंडळाला जे ५७ वर्षात जमले नाही ते मराठी भाषा, साहित्य व संस्कृती धोरण ठरविण्याचे महत्त्वपूर्ण काम या काळात झाले. संमेलन अध्यक्षांची निवडणूक पद्धत रद्द करण्यात आली व इतर महत्त्वाची कामे महामंडळाने विदर्भाकडे असताना केली. त्यामुळे केवळ टीका करण्यापूर्वी याचाही विचार व्हावा, असे मत संबंधित सदस्याने व्यक्त केले.

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठी