शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

‘स्वाईन फ्लू’ बैठकीपुरतेच गंभीर

By admin | Updated: February 10, 2015 00:53 IST

मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन स्वाईन फ्लू संशयितांच्या रुग्णांचा मृत्यू रविवारी झाला, परंतु आज सोमवारी पाठविण्यात आलेल्या या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणीच झाली नाही.

दोन मृत संशयितांचे नमुने तपासलेच नाही नागपूर : मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन स्वाईन फ्लू संशयितांच्या रुग्णांचा मृत्यू रविवारी झाला, परंतु आज सोमवारी पाठविण्यात आलेल्या या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणीच झाली नाही. विशेष म्हणजे, मेयोच्या प्रयोगशाळेत दिवसभरात फक्त १३ नमुनेच तपासले जातात. सोमवारी मेडिकलकडून १८ नमुने पाठविण्यात आले होते, यातील फक्त सात नमुने तपासण्यात आले. यातील सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याच्या तुलनेत उपराजधानीत स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येत असताना, प्रशासन मात्र बैठकीपुरतेच गंभीर असल्याचे या वास्तवातून समोर आले आहे. मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात रविवारी रात्री ९ वाजता बेसा येथील एका ३५ वर्षीय रुग्णाचा तर याच रात्री १.३० वाजता छिंदवाडा येथील ४० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. रविवारी मेयोची प्रयोगशाळा बंद राहत असल्याने सोमवारी या दोन मृतांसह १८ संशयित रुग्णांचे नमुने पाठविण्यात आले. परंतु यातील फक्त सातच नमुने तपासण्यात आले. परिणामी संशयित रुग्णांवरील उपचाराची दिशा ठरविण्यास डॉक्टर अडचणीत आले आहेत तर मृताचे नातेवाईक दहशतीच्या वातावरणात आहेत.दोन मुलांना स्वाईन फ्लू उपराजधानीत २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. परंतु यावर्षी पहिल्यांदाच पाच वर्षांखालील दोन मुलांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुलांमध्ये स्वाईन फ्लू दिसून येणे हे आजारात वाढ होण्याचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात सहा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन वर्षांची मुलगी, पाच वर्षांचा मुलगा यांच्यासह ६३ व २४ वर्षांची महिला तर ५० व ४४ वर्षांचे पुरुष आहेत. सध्या मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात २४ रुग्ण उपचार घेत आहेत. (प्रतिनिधी)ंहायकोर्टात अर्जस्वाईन फ्लू या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे व्यावसायिक अनिल आग्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. आग्रे यांची डेंग्यू आजारासंदर्भातील जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात हा अर्ज करून याचिकेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. अर्जात महानगरपालिका, मेडिकल व मेयो रुग्णालयाला प्रतिवादी करण्यात आले आहे. स्वाईन फ्लूचा प्रसार थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु प्रशासन वेगवान पावले उचलत नसल्यामुळे स्वाईन फ्लूने अनेकांचे बळी घेतले, असे अर्जदाराचे म्हणणे आहे. ताज्या आकडेवारीनुसार नागपूर विभागात स्वाईन फ्लूने २२ रुग्णांचे बळी घेतले आहेत.वैज्ञानिक विश्लेषणाची गरज मेडिकलमध्ये आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये २८ महिला आहेत तर १२ पुरुष आहेत. तज्ज्ञांच्या मते महिलामंध्ये स्वाईन फ्लू वाढण्याला घेऊन वैज्ञानिक विश्लेषण होण्याची गरज आहे. सोबतच मृतांमध्ये ३० वर्षांखालील चार रुग्णांचा, ३० ते ४० वर्षांतील चार रुग्णांचा तर ५० ते ६० वर्षांतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वयाच्या चाळीशीपर्यंत मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहत असतानाही सर्वात जास्त याच वयाच्या आतील रुग्णांचा मृत्यू झाल्याने याविषयीही विश्लेषण होणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.