शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
7
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
8
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
9
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
10
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
11
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
12
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
13
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
14
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
15
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
16
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
17
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
18
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
19
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
20
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 

खुनाचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारावर हल्ला

By admin | Updated: January 12, 2017 01:44 IST

शांतिनगर येथील अनवर ऊर्फ चांदी हत्याकांडात सहभागी असलेला गुन्हेगार सय्यद अयाज अलीवर मंगळवारी रात्री हल्ला करण्यात आला.

शांतिनगरात गँगवारची शक्यता : पोलिसांच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये दहशत नागपूर : शांतिनगर येथील अनवर ऊर्फ चांदी हत्याकांडात सहभागी असलेला गुन्हेगार सय्यद अयाज अलीवर मंगळवारी रात्री हल्ला करण्यात आला. अनवरच्या खुनाने संतापलेला त्याचा भाऊ अकबर याने साथीदाराच्या मदतीने हा हल्ला केला. अनवरनंतर आपलाही खून होण्याच्या भीतीने अकबरने हा हल्ला केल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर शांतिनगर परिसरात गँगवार भडकण्याची शक्यता बळावली आहे. अनवर ऊर्फ चांदी याचा सव्वा वर्षांपूर्वी अपहरण करून खून करण्यात आला होता. चांदीच्या खुनाला सुरुवातीला पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी गुन्हासुद्धा दाखल केला नव्हता. प्रकरण अंगावर शेकल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शांतिनगर परिसरातील कुख्यात गुंड वसीम ऊर्फ चिऱ्याने अयाज व इतर साथीदारांच्या मदतीने चांदीचा खून केला होता. तसेच मृतदेह कामठीतील कालव्यात फेकला होता. या खुनाचा मुख्य सूत्रधार वसीम अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तर अयाज आणि इतर आरोपी दीड महिन्यांपूर्वीच जामिनावर सुटले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चांदी हत्याकांडातील आरोपी अनेक दिवसांपासून अकबरला धमकावीत आहेत. अनवरनंतर त्याचाही खून करण्यात येणार असल्याचे सांगून ते लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. यामुळे अकबर संतापला होता. त्यामुळेच त्याने भावाच्या खुनाचा बदला घेऊन अयाजला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी रात्री ९.३० वाजता अय्याज शांतिनगरमध्ये बसला होता. अकबर आपल्या साथीदारांसोबत तिथे आला. येताच ‘तू माझ्या भावचा खून का केला’ असे विचारीत धमकावू लागला तसेच मारहाण केली. पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अयाजने शांतिनगर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दंगा व मारहाणीचा गुन्हा दाखल करीत अकबर व त्याच्या साथीदारांना अटक केली. या घटनेनंतर शांतिनगर परिसरात दहशत पसरली आहे. अकबर आॅटोचालक आहे. त्याच्या साथीदारांचे म्हणणे आहे की, पोलीस अकबर व त्याच्या नातेवाईकांना त्रास देत आहे. अयाज आणि अनवर हत्याकांडातील आरोपी काही दिवसांपासून लोकांना धमकावित आहेत. चांदीच्या खुनाचा मुख्य आरोपी वसीम याला पकडण्यासाठी पोलिसांनी कुठलेही प्रयत्न केले नाही. पोलिसांनी याबाबत उदासीन धोरण अवलंबिले आहे.(प्रतिनिधी) गुन्हेगारांना मिळत आहे आश्रय सूत्रांनुसार चांदी हत्याकांडातील आरोपींना पोलिसांचा आश्रय मिळाला आहे. जामिनावरून आल्यापासून आरोपी लोकांमध्ये दहशत पसरवित असल्याची माहिती पोलिसांनाही आहे. त्यानंतरही पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. यामुळे ताजी घटना घडली.