शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खुनाचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारावर हल्ला

By admin | Updated: January 12, 2017 01:44 IST

शांतिनगर येथील अनवर ऊर्फ चांदी हत्याकांडात सहभागी असलेला गुन्हेगार सय्यद अयाज अलीवर मंगळवारी रात्री हल्ला करण्यात आला.

शांतिनगरात गँगवारची शक्यता : पोलिसांच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये दहशत नागपूर : शांतिनगर येथील अनवर ऊर्फ चांदी हत्याकांडात सहभागी असलेला गुन्हेगार सय्यद अयाज अलीवर मंगळवारी रात्री हल्ला करण्यात आला. अनवरच्या खुनाने संतापलेला त्याचा भाऊ अकबर याने साथीदाराच्या मदतीने हा हल्ला केला. अनवरनंतर आपलाही खून होण्याच्या भीतीने अकबरने हा हल्ला केल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर शांतिनगर परिसरात गँगवार भडकण्याची शक्यता बळावली आहे. अनवर ऊर्फ चांदी याचा सव्वा वर्षांपूर्वी अपहरण करून खून करण्यात आला होता. चांदीच्या खुनाला सुरुवातीला पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी गुन्हासुद्धा दाखल केला नव्हता. प्रकरण अंगावर शेकल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शांतिनगर परिसरातील कुख्यात गुंड वसीम ऊर्फ चिऱ्याने अयाज व इतर साथीदारांच्या मदतीने चांदीचा खून केला होता. तसेच मृतदेह कामठीतील कालव्यात फेकला होता. या खुनाचा मुख्य सूत्रधार वसीम अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तर अयाज आणि इतर आरोपी दीड महिन्यांपूर्वीच जामिनावर सुटले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चांदी हत्याकांडातील आरोपी अनेक दिवसांपासून अकबरला धमकावीत आहेत. अनवरनंतर त्याचाही खून करण्यात येणार असल्याचे सांगून ते लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. यामुळे अकबर संतापला होता. त्यामुळेच त्याने भावाच्या खुनाचा बदला घेऊन अयाजला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी रात्री ९.३० वाजता अय्याज शांतिनगरमध्ये बसला होता. अकबर आपल्या साथीदारांसोबत तिथे आला. येताच ‘तू माझ्या भावचा खून का केला’ असे विचारीत धमकावू लागला तसेच मारहाण केली. पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अयाजने शांतिनगर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दंगा व मारहाणीचा गुन्हा दाखल करीत अकबर व त्याच्या साथीदारांना अटक केली. या घटनेनंतर शांतिनगर परिसरात दहशत पसरली आहे. अकबर आॅटोचालक आहे. त्याच्या साथीदारांचे म्हणणे आहे की, पोलीस अकबर व त्याच्या नातेवाईकांना त्रास देत आहे. अयाज आणि अनवर हत्याकांडातील आरोपी काही दिवसांपासून लोकांना धमकावित आहेत. चांदीच्या खुनाचा मुख्य आरोपी वसीम याला पकडण्यासाठी पोलिसांनी कुठलेही प्रयत्न केले नाही. पोलिसांनी याबाबत उदासीन धोरण अवलंबिले आहे.(प्रतिनिधी) गुन्हेगारांना मिळत आहे आश्रय सूत्रांनुसार चांदी हत्याकांडातील आरोपींना पोलिसांचा आश्रय मिळाला आहे. जामिनावरून आल्यापासून आरोपी लोकांमध्ये दहशत पसरवित असल्याची माहिती पोलिसांनाही आहे. त्यानंतरही पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. यामुळे ताजी घटना घडली.