शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कामाच्या ताणामुळे गुन्ह्यांचा तपासात त्रुटी राहतात : भूषणकुमार उपाध्याय यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 22:19 IST

राज्य पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण असतो. त्यामुळे ते गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने करू शकत नाहीत. परिणामी, तपासात विविध प्रकारच्या त्रुटी राहतात. त्याचा लाभ मिळून आरोपी निर्दोष सुटतात अशी खंत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देएचसीबीए स्टडी सर्कलमध्ये व्याख्यान

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : राज्य पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण असतो. त्यामुळे ते गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने करू शकत नाहीत. परिणामी, तपासात विविध प्रकारच्या त्रुटी राहतात. त्याचा लाभ मिळून आरोपी निर्दोष सुटतात अशी खंत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केली. हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या स्टडी सर्कलमध्ये बुधवारी त्यांचे व्याख्यान झाले.कामाचा ताण ही राज्य पोलिसांपुढील सर्वात मोठी समस्या आहे. सीबीआय, एसीबी, ईडी आदी संस्थांमधील अधिकारी वर्षभरात केवळ ४-५ गुन्ह्यांचा तपास करतात. त्यामुळे त्यांचा तपास गुणवत्तापूर्ण असतो. त्यांच्यासोबत राज्य पोलीस विभागाची तुलना केली जाऊ शकत नाही. राज्य पोलीस अधिकाऱ्यांना वर्षभरात तब्बल ३० ते ४० प्रकरणांचा तपास करावा लागतो. त्यासोबत त्यांना शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, व्हीआयपी बंदोबस्त, सामाजिक वादावर नियंत्रण ठेवणे, नाईट पेट्रोलिंग इत्यादी कामेही करावी लागतात. त्यामुळे ते गुन्ह्याच्या तपासाकरिता पुरेसा वेळ देऊ शकत नाही. परिणामी, त्यांच्या तपासात विविध प्रकारच्या त्रुटी आढळून येतात असे उपाध्याय यांनी सांगितले.दोषारोपपत्रे तपासण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्या समित्या सर्व दोषारोपपत्रांना हिरवी झेंडी दाखवतात. त्यामुळे गुणवत्ता नसलेली दोषारोपपत्रेही न्यायालयात दाखल होतात. त्यातून न्यायालयाचा व पोलीस अधिकाऱ्यांचा वेळ व परिश्रम विनाकारण खर्च होतात. पोलीस ठाण्यातील ३० ते ४० टक्के तक्रारी बोगस असतात. ती प्रकरणे प्राथमिकस्तरावरच संपणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे चालून त्याचा सर्वांनाच मनस्ताप होतो याकडे उपाध्याय यांनी लक्ष वेधले.गुन्हेगारांना पकडणे व त्यांना शिक्षा व्हावी याकरिता प्रयत्न करणे हे पोलिसांचे मुख्य कार्य आहे. परंतु, गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण देशामध्ये केवळ ४० टक्के तर, महाराष्ट्रात सुमारे ३३ टक्के आहे. ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. आरोपीने गुन्हा केला असल्यास त्याला कोणत्याही परिस्थितीत शिक्षा झाली पाहिजे. परंतु, बरेचदा तसे होत नाही. यावर सरकारने गांभिर्याने विचार करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे असेही उपाध्याय यांनी यावेळी सांगितले. व्यासपीठावर संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील व सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर उपस्थित होते. अ‍ॅड. रणजित भुईभार यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :PoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालयadvocateवकिल