शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील राज डोरलेच्या हत्याकांडाचा तपास गुन्हे शाखेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 20:28 IST

भाजपाचा पदाधिकारी राज डोरले याच्या हत्याकांडाचा तपास आता गुन्हेशाखेला सोपविला आहे. राजच्या हत्येचा स्वतंत्र व निष्पक्ष तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहे. गुन्हेशाखेने राजच्या हत्येचा सूत्रधार आशिष वाजूरकरसह पाच आरोपीेंना ताब्यात घेतले आहे. ते १२ जूनपर्यंत कोठडीत आहे.

ठळक मुद्देहोऊ शकतो सुपारी किलरचा पर्दाफाश : आरोपींची १२ पर्यंत कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचा पदाधिकारी राज डोरले याच्या हत्याकांडाचा तपास आता गुन्हेशाखेला सोपविला आहे. राजच्या हत्येचा स्वतंत्र व निष्पक्ष तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहे. गुन्हेशाखेने राजच्या हत्येचा सूत्रधार आशिष वाजूरकरसह पाच आरोपीेंना ताब्यात घेतले आहे. ते १२ जूनपर्यंत कोठडीत आहे.१ जूनच्या रात्री महाल परिसरातील भूतेश्वरनगर येथे २८ वर्षीय राज डोरले याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी मुकेश नारनवरे व अंकित चतूरकर या आरोपींना अटक केली होती. अटकेतील आरोपी मुकेशने सांगितले की राज त्याच्यावर हल्ला करणार होता, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. त्याने या हत्याकांडात इतर कुणाचाही हात नसल्याचे सांगितले. लोकमतने या प्रकरणात सुपारी देऊन हत्या केल्याचा खुलासा केला होता. पोलिसांनी वृत्ताची दखल घेत, चौकशी करून आशिष वाजूरकर याच्याकडून हत्येची सुपारी दिल्याचा खुलासा केला. पोलिसांनी आशिषसोबत त्याचा मित्र रुपेश मेश्राम व आकाश मेश्राम यालाही अटक केली. राजकीय विरोधासोबतच पैशासाठी राजची हत्या केल्याची चर्चाही होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास गुन्हेशाखेच्या युनिट ३ ला सोपविण्यात आला. गुन्हेशाखेचे अधिकारी विनोद चौधरी यांनी मंगळवारी आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला.सूत्रांच्या मते राज सट्टेबाजी करीत होता. तो सामाजिक कार्यातही लाखो रुपये खर्च करीत होता. राज महापालिकेची निवडणूक लढण्याच्या तयारीत होता. हत्येचा सूत्रधार आशिषसुद्धा राजकारणात सक्रिय आहे. त्याला राज विरोधक भासत होता. राजचेसुद्धा काही लोकांवर २ कोटी रुपये थकीत होते. राजकडून वारंवार मागणी होत असल्याने ते चिंतेत होते. आशिषचे म्हणणे आहे की तो राजच्या टार्गेटवर होता. त्याला अनेकांने सांगितले होते. त्याच कारणाने त्याची हत्या करण्यात आली. सूत्रांच्या मते राजकीय वाद व पैशाच्या वादातून हत्या केली जाऊ शकते. त्यामुळे आशिषने योजना आखून त्याची हत्या केली. राजच्या हत्येमुळे भाजप नेत्यांमध्ये सुद्धा खळबळ माजली आहे. त्यांना राजच्या हत्येमागे मोठा कट दिसून येत आहे. मात्र गुन्हेशाखेच्या चौकशीत आशिषने राजकीय वाद अथवा पैशाच्या वादामुळे हत्या केली नसल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून