शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

बालकांविरुद्धचे गुन्हे कठोरतेने हाताळणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 11:08 IST

अल्पवयीन बालकास लक्ष्य करणाऱ्या गुन्ह्यांमध्ये कठोर भूमिका घेतली तरच गुन्हेगारांवर वचक राहील असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले.

ठळक मुद्देहायकोर्टाचे निरीक्षण आरोपींवर दया दाखविण्यास नकार दिला

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन बालकास लक्ष्य करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरतेने हाताळणे आवश्यक आहे. अशा गुन्ह्यांमध्ये कठोर भूमिका घेतली तरच गुन्हेगारांवर वचक राहील व समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले.न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांनी नुकताच हा निर्णय दिला. अल्पवयीन मुलाचे अपहरण करणारे दोन आरोपी तरुण असल्यामुळे त्यांची शिक्षा कमी करण्याची विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने ती विनंती फेटाळून लावली. विविध कारणांनी अल्पवयीन बालकांचे अपहरण करण्याच्या, त्यांचा खून करण्याच्या आणि त्यांच्यावर बलात्कार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे गुन्हे चिंताजनक आहेत. अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्याकरिता गुन्हेगारांना कायद्यानुसार शिक्षा सुनावणे आवश्यक आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त करून दोन्ही आरोपींना तरुण वयाचा लाभ देण्यास नकार दिला. दोन्ही आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असून, त्यावरून आरोपींनी अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याचे सिद्ध होते.आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. गुन्ह्याचे स्वरूप व कायद्यातील तरतूद पाहता त्या निर्णयात बदल केला जाऊ शकत नाही, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले.भगवान गजानन फंदाट व माधव रवींद्र कापडे अशी आरोपींची नावे असून, ते खामगाव, जि. बुलडाणा येथील रहिवासी आहेत. २० सप्टेंबर २०११ रोजी त्यांनी पाच कोटी रुपये खंडणीसाठी ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांचा आठ वर्षीय मुलगा कल्पेशचे अपहरण केले होते व त्यानंतर ठार मारण्याच्या उद्देशाने त्याला विहिरीत फेकून दिले होते. त्यावेळी फंदाट २६ तर, कापडे २३ वर्षे वयाचा होता. सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे भूमिका मांडून आरोपींचे अपील खारीज केले व सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय