शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

रेल्वेच्या ई-तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्यांना दणका

By नरेश डोंगरे | Updated: May 14, 2024 21:04 IST

आरपीएफकडून १३ दलाल जेरबंद : सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त.

नागपूर : रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याची संधी साधून अवैध मार्गाने ई तिकिट मिळवणाऱ्या आणि नंतर त्याची काळाबाजारी करून प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या दलालांविरुद्ध दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या १५ दिवसांत ठिकठिकाणच्या १३ दलालांना दणका देऊन त्यांच्याकडून जुन्या-नव्या रेल्वे तिकिट, आणि ईतर साहित्य असा एकूण सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रवाशांची गर्दी सारखी वाढतच आहे. त्यामुळे बहुतांश रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षित तिकिट मिळेनासे झाले आहे. दुसरीकडे दलाल आपले जुगाड करून अवैध मार्गाने ई तिकिटा मिळवून त्याची काळाबाजारी करीत आहेत. रेल्वेच्या खिडकीवर किंवा संकेतस्थळावर आरक्षित तिकिट मिळत नाही. मात्र,दलालांकडे गेल्यास सहज आरक्षित तिकिट मिळते. एका तिकिटावर दलाल प्रवाशांकडून ३०० ते ७०० रुपये जास्त घेतात, अशी स्थिती असल्याने रेल्वे प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्या ध्यानात घेता आरपीएफचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आरक्षित तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्या दलालांविरुद्ध विशेष कारवाईची मोहिम राबविण्याचे आदेश आपल्या ठिकठिकाणच्या पथकांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, १ मे ते १३ मे २०२४ या कालावधीत १३ दलालांकडे छापे टाकून त्यांना अटक करण्यातर आली. त्यांच्याकडून १८३०४ रुपयांच्या ८ नवीन तर, २ लाख, ३ हजारांच्या १५९ तिकिट जप्त करण्यात आल्या. या तिकिटा मिळवण्यासाठी दलालांनी वापरण्यात आलेले कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल तसेच अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे. स्टेशन निहाय पकडण्यात आलेले दलालआरपीएफने स्टेशन निहाय पकडण्यात आलेले दलाल पुढील प्रमाणे आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस, ईतवारी रेल्वे स्थानक नागपूर २ दलाल, मोतीबाग नागपूर १, भंडारा २, गोंदिया १, डोंगरगड १, नैनपूर ३ आणि छिंदवाडा ३ दलाल. प्रवाशांनी दलालांकडे जाऊ नयेप्रवासी दलालांकडून तिकिटा घेतात म्हणून ते काळाबाजारी करतात. प्रवासी दलालांकडे गेलेच नाही तर दलाल तिकिटांची काळाबाजारी करणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी दलालांकडे जाण्याऐवजी रेल्वे काउंटर किंवा संकेतस्थळावरून तिकिटा घ्याव्या, असे आवाहन सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी केले आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर