शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

रेल्वे प्रवाशांशी सौजन्याने वागा : बृजेश कुमार गुप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 22:10 IST

प्रवासात प्रवाशांच्या गरजा, त्यांच्या अडचणी जाणून त्यांच्या समस्यांचे निराकरण केल्यास रेल्वेची प्रतिमा उंचावण्यास मदत होते. त्यामुळे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी आपले काम इमानदारीने करून प्रवाशांना सेवा द्यावी असे प्रतिपादन विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी केले.

ठळक मुद्देतिकीट तपासणी कर्मचाऱ्यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवासात प्रवाशांच्या गरजा, त्यांच्या अडचणी जाणून त्यांच्या समस्यांचे निराकरण केल्यास रेल्वेची प्रतिमा उंचावण्यास मदत होते. त्यामुळे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी आपले काम इमानदारीने करून प्रवाशांना सेवा द्यावी असे प्रतिपादन विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी केले.रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी ‘डीआरएम’कार्यालयाच्या समाधान कक्षात तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, प्रवाशांशी संवाद साधताना सौजन्य दाखविण्याची गरज आहे. प्रवाशांना असमाधानकारक सेवा दिल्यास वाद निर्माण होतो. त्यामुळे प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून त्यांनी चांगल्या कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र, सहायक कार्मिक अधिकारी मंगेश काशीमकर आणि ५९ तिकीट तपासणी कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :ticketतिकिटRailway Passengerरेल्वे प्रवासी