शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सरकारी विभागातील गैरव्यवहारांच्या चौकशीवर न्यायालयाची देखरेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 01:11 IST

राज्याच्या विविध विभागांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ््यांच्या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे विशेष समिती नेमण्यात आली आहे. अनेक सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराची प्रकरणे असूनदेखील त्यात बराच काळ कुठलीच कारवाई होत नाही. त्यामुळे ही समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि एक सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश राहणार आहेत.

ठळक मुद्देविशेष समिती नेमली : उच्च व जिल्हा न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या विविध विभागांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ््यांच्या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे विशेष समिती नेमण्यात आली आहे. अनेक सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराची प्रकरणे असूनदेखील त्यात बराच काळ कुठलीच कारवाई होत नाही. त्यामुळे ही समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि एक सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश राहणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, राळेगाव व केळापूर तालुक्यात ‘मनरेगा’ अंतर्गत करण्यात आलेल्या कामांत गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणातील जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड.ए.हक यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिला.घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर निस्ताने यांनी याचिका दाखल केली होती. तिन्ही तालुक्यांत मनरेगा योजनेंतर्गत ११९ कोटींची कामे करण्यात आली. कामे यंत्राद्वारे करण्यात आली व मजुरांचे कार्ड दाखवून पैसे उचलण्यात आले. त्यासंदर्भात सरकारकडे तक्रार करूनही योग्य ती कारवाई करण्यात आली नाही. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने सरकारी विभागांमधील गैरव्यवहार, त्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करायला हवी, असे मत व्यक्त केले होते. २०१२ पासून सहा वर्षे उलटल्यावरदेखील सरकारकडून कोणतीच कठोर कारवाई करण्यात आली नाही. प्रकरणात गुन्हा दाखल असून आरोपपत्र प्रलंबित आहेत.या अगोदरदेखील गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे समोर आली आहे. अशा घोटाळयांमध्ये केवळ जनतेच्या पैशाची लूट होते. तसेच चौकशी व कारवाईच्या नावावर केवळ सरकार व न्यायपालिकेचा वेळ जातो. त्यामुळे सरकार व प्रशासनाच्या दबावात न येणारी स्वतंत्र तपास यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे असे पुन्हा नमूद करून उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांची समिती नेमली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड.महेश धात्रक आणि सरकारतर्फे अ‍ॅड.दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजी