शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सरकारी विभागातील गैरव्यवहारांच्या चौकशीवर न्यायालयाची देखरेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 01:11 IST

राज्याच्या विविध विभागांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ््यांच्या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे विशेष समिती नेमण्यात आली आहे. अनेक सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराची प्रकरणे असूनदेखील त्यात बराच काळ कुठलीच कारवाई होत नाही. त्यामुळे ही समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि एक सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश राहणार आहेत.

ठळक मुद्देविशेष समिती नेमली : उच्च व जिल्हा न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या विविध विभागांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ््यांच्या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे विशेष समिती नेमण्यात आली आहे. अनेक सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराची प्रकरणे असूनदेखील त्यात बराच काळ कुठलीच कारवाई होत नाही. त्यामुळे ही समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि एक सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश राहणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, राळेगाव व केळापूर तालुक्यात ‘मनरेगा’ अंतर्गत करण्यात आलेल्या कामांत गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणातील जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड.ए.हक यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिला.घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर निस्ताने यांनी याचिका दाखल केली होती. तिन्ही तालुक्यांत मनरेगा योजनेंतर्गत ११९ कोटींची कामे करण्यात आली. कामे यंत्राद्वारे करण्यात आली व मजुरांचे कार्ड दाखवून पैसे उचलण्यात आले. त्यासंदर्भात सरकारकडे तक्रार करूनही योग्य ती कारवाई करण्यात आली नाही. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने सरकारी विभागांमधील गैरव्यवहार, त्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करायला हवी, असे मत व्यक्त केले होते. २०१२ पासून सहा वर्षे उलटल्यावरदेखील सरकारकडून कोणतीच कठोर कारवाई करण्यात आली नाही. प्रकरणात गुन्हा दाखल असून आरोपपत्र प्रलंबित आहेत.या अगोदरदेखील गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे समोर आली आहे. अशा घोटाळयांमध्ये केवळ जनतेच्या पैशाची लूट होते. तसेच चौकशी व कारवाईच्या नावावर केवळ सरकार व न्यायपालिकेचा वेळ जातो. त्यामुळे सरकार व प्रशासनाच्या दबावात न येणारी स्वतंत्र तपास यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे असे पुन्हा नमूद करून उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांची समिती नेमली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड.महेश धात्रक आणि सरकारतर्फे अ‍ॅड.दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजी