शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

न्यायालय पंतप्रधानांसोबतही कठोरतेने वागू शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 23:16 IST

कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरण चालवित असलेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. काझी यांनी एका मुद्यावरून प्रकरणातील आरोपींना न्यायालय गरज पडल्यास देशाच्या पंतप्रधानासोबतही कठोरतेने वागू शकते असे सुनावले.

ठळक मुद्देन्यायाधिशांनी आरोपींना सुनावले : कांबळे दुहेरी हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरण चालवित असलेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. काझी यांनी एका मुद्यावरून प्रकरणातील आरोपींना न्यायालय गरज पडल्यास देशाच्या पंतप्रधानासोबतही कठोरतेने वागू शकते असे सुनावले.न्या. काझी राजकीय दबावात कार्य करीत असल्याचे आरोपींचे म्हणणे आहे. न्यायालयाने यावर खंत व्यक्त करून आरोपींचा हा समज पूर्वग्रहदूषित असल्याचे सांगितले. तसेच, न्यायालय राजकारणात कधीच शिरत नाही. न्यायालय गरज पडल्यास देशाच्या पंतप्रधानासोबतही कठोरतेने वागू शकते. ही बाब आरोपींनी समजायला हवी असे मत त्यांनी आदेशात नोंदवले.आरोपींना हे प्रकरण दुसऱ्या न्यायालयात स्थानांतरित करायचे आहे. त्याकरिता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुदत मिळावी यासाठी आरोपींनी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जात न्यायालय राजकीय दबावात कार्य करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायाधीश काझी यांनी आरोपींना त्यांचे प्रयत्न करण्याची संधी मिळावी म्हणून अर्ज मंजूर केला व आरोपींना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी १५ दिवसांचा वेळ दिला. परंतु, तत्पूर्वी त्यांनी वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले.गणेश शाहू व त्याची पत्नी गुडिया हे प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांच्यावर उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांचा खून केल्याचा आरोप आहे. ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. घटनेच्या दिवशी आरोपी व उषा कांबळे यांच्यामध्ये भिसीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह नाल्यात फेकून दिले. आरोपी पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयprime ministerपंतप्रधान