शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

वृद्धापकाळाला कंटाळून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या; इमामवाड्यातील घटना

By दयानंद पाईकराव | Updated: June 22, 2024 16:53 IST

मुलगा नसल्याने मुलीच करीत होत्या सांभाळ

नागपूर : मुलगा नसल्यामुळे पाच मुलीच आईवडिलांचा सांभाळ करायच्या. परंतु वय झाल्यामुळे किती दिवस मुलींच्या घरी राहून त्यांना त्रास द्यायया, असा विचार करून एका वृद्ध दाम्पत्याने मुलीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ८.३० ते ११ वाजताच्या दरम्यान घडली. दरम्यान वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

श्रीराम बापूराव कटरे (८५) आणि शकुंतला श्रीराम कटरे (८२, रा. यशोदानगर रुक्मिणीनगर, अमरावती) असे गळफास घेतलेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. श्रीराम हे अमरावतीत यशोदानगरात पत्नी शकुंतला सोबत राहत होते. त्यांना पाच मुली असून मुलगा नाही. मुलींचे लग्न झाल्यानंतर श्रीराम आणि त्यांची पत्नी एकाकी पडले. दोघेही वयोवृद्ध असल्यामुळे त्यांची तब्येतही बरी राहत नव्हती. एकाकीपणामुळे दोघेही आपल्या मुलींकडे जाऊन राहत असत. मुलीच त्यांचा सांभाळ करू लागल्या.

२६ मे २०२४ रोजी ते चंदनगर येथे राहणारी विधवा असलेली मोठी मुलगी ज्योती श्रीराम पारधी (६४) हिच्याकडे आले होते. महिनाभरापासून ते मुलीच्या घरीच राहत होते. परंतु मुलीकडे किती दिवस रहायचे, असा विचार नेहमीच त्यांच्या मनात यायचा. याबद्दल ते नातेवाईकांकडे बोलूनही दाखवायचे. शुक्रवारी त्यांची मुलगी ज्योती हिच्या पुतण्याचा वाढदिवस असल्यामुळे त्या अलंकारनगरला गेल्या. कटरे दाम्पत्याने त्यांच्यासोबत जाण्यास मनाई केली. मुलगी घरी नसल्याचे पाहून दोघाही पती-पत्नीने मुलीच्या घरी सिलींग फॅनला साडी बांधुन गळफास घेतला. मुलगी आल्यानंतर तिला आईवडिल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच तिने हंबरडा फोडला. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करू तपास सुरु केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी