शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भूतकाळातील शासनांमुळे देशाचे नुकसान

By admin | Updated: September 17, 2015 03:46 IST

‘सॉफ्टवेअर’च्या क्षेत्रात आपला देश समोर असला तरी ‘हार्डवेअर’मध्ये अजूनही फारशी प्रगती नाही.

एन.आर.नारायण मूर्ती यांचे टीकास्त्र : ‘हार्डवेअर’ निर्मिती क्षेत्रात समोर येण्याची संधी गमावली नागपूर : ‘सॉफ्टवेअर’च्या क्षेत्रात आपला देश समोर असला तरी ‘हार्डवेअर’मध्ये अजूनही फारशी प्रगती नाही. भारताकडे क्षमता असतानादेखील केवळ भूतकाळातील केंद्र सरकारांच्या धोरणांमुळे या क्षेत्रात देशाचे नुकसान झाले व जगाचे नेतृत्व करण्याची संधी गमावली, अशी टीका ‘इन्फोसिस’चे माजी चेअरमन एन.आर.नारायण मूर्ती यांनी केली. नागपूर येथे अभियंता दिनानिमित्त बुधवारी ‘इंजिनिअर्स फोरम’तर्फे आयोजित कार्यक्रमात मूर्ती यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.संगणक तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ‘हार्डवेअर’संदर्भात चीनला जगाची ‘फॅक्टरी’ म्हणण्यात येते. आपल्या देशातदेखील ही क्षमता होती. परंतु १९७५ ते १९९१ दरम्यानच्या केंद्र सरकारच्या धोरणांमुळे उत्पादक अक्षरश: ‘बॅकफूट’वर गेले. उत्पादनांवरील जास्त कर व विविध निर्बंधामुळे देशाने ‘हार्डवेअर’ क्षेत्रात समोर येण्याची मोठी संधी गमावली, असे एन.आर.नारायण मूर्ती म्हणाले. दरम्यान, ‘सॉफ्टवेअर’ क्षेत्रात जगभरामध्ये भारतीयांचा दबदबा कायम असून यामुळे भारताला एक नवा विश्वास प्राप्त झाला आहे. देश आज जगातील ‘सॉफ्टवेअर सेंटर’ झाला आहे.२४ तास कामाची प्रणाली व ‘जीडीएम’ (ग्लोबल डिलीव्हरी मॉडेल) यामुळे भारतीय ‘सॉफ्टवेअर’ क्षेत्राने खरी भरारी घेतली व आज देशातील सर्वात जास्त रोजगार ‘आयटी’ क्षेत्रातच निर्माण होत आहेत. या क्षेत्रात आणखी प्रगती करण्यासाठी कंपन्यांनी ‘मल्टिकल्चर’ प्रणालीचा अवलंब करून जगातील सर्वच देशातून मनुष्यबळाची भरती केली पाहिजे असे ते म्हणाले.यावेळी ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, ‘इंजिनिअर्स फोरम’चे अध्यक्ष सुरेश नशिंदे, कोषाध्यक्ष एस.आर.गढेवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशातील निर्मिती क्षमता वाढीस लागायला हवी व पूर्ण ‘प्रोडक्ट’ येथेच तयार व्हावेत यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन विश्राम जामदार यांनी केले. यावेळी नारायण मूर्ती यांच्या हस्ते निबंधस्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात अले. यात ‘व्हीएनआयटी’चा प्रथमेश जोशी, प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रदीप अटोले व सेंट विन्सेन्ट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयाची रिया चक्रवर्ती यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरेश शिंदे यांनी केले तर महेश गुप्ता यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)