शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

भूतकाळातील शासनांमुळे देशाचे नुकसान

By admin | Updated: September 17, 2015 03:46 IST

‘सॉफ्टवेअर’च्या क्षेत्रात आपला देश समोर असला तरी ‘हार्डवेअर’मध्ये अजूनही फारशी प्रगती नाही.

एन.आर.नारायण मूर्ती यांचे टीकास्त्र : ‘हार्डवेअर’ निर्मिती क्षेत्रात समोर येण्याची संधी गमावली नागपूर : ‘सॉफ्टवेअर’च्या क्षेत्रात आपला देश समोर असला तरी ‘हार्डवेअर’मध्ये अजूनही फारशी प्रगती नाही. भारताकडे क्षमता असतानादेखील केवळ भूतकाळातील केंद्र सरकारांच्या धोरणांमुळे या क्षेत्रात देशाचे नुकसान झाले व जगाचे नेतृत्व करण्याची संधी गमावली, अशी टीका ‘इन्फोसिस’चे माजी चेअरमन एन.आर.नारायण मूर्ती यांनी केली. नागपूर येथे अभियंता दिनानिमित्त बुधवारी ‘इंजिनिअर्स फोरम’तर्फे आयोजित कार्यक्रमात मूर्ती यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.संगणक तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ‘हार्डवेअर’संदर्भात चीनला जगाची ‘फॅक्टरी’ म्हणण्यात येते. आपल्या देशातदेखील ही क्षमता होती. परंतु १९७५ ते १९९१ दरम्यानच्या केंद्र सरकारच्या धोरणांमुळे उत्पादक अक्षरश: ‘बॅकफूट’वर गेले. उत्पादनांवरील जास्त कर व विविध निर्बंधामुळे देशाने ‘हार्डवेअर’ क्षेत्रात समोर येण्याची मोठी संधी गमावली, असे एन.आर.नारायण मूर्ती म्हणाले. दरम्यान, ‘सॉफ्टवेअर’ क्षेत्रात जगभरामध्ये भारतीयांचा दबदबा कायम असून यामुळे भारताला एक नवा विश्वास प्राप्त झाला आहे. देश आज जगातील ‘सॉफ्टवेअर सेंटर’ झाला आहे.२४ तास कामाची प्रणाली व ‘जीडीएम’ (ग्लोबल डिलीव्हरी मॉडेल) यामुळे भारतीय ‘सॉफ्टवेअर’ क्षेत्राने खरी भरारी घेतली व आज देशातील सर्वात जास्त रोजगार ‘आयटी’ क्षेत्रातच निर्माण होत आहेत. या क्षेत्रात आणखी प्रगती करण्यासाठी कंपन्यांनी ‘मल्टिकल्चर’ प्रणालीचा अवलंब करून जगातील सर्वच देशातून मनुष्यबळाची भरती केली पाहिजे असे ते म्हणाले.यावेळी ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, ‘इंजिनिअर्स फोरम’चे अध्यक्ष सुरेश नशिंदे, कोषाध्यक्ष एस.आर.गढेवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशातील निर्मिती क्षमता वाढीस लागायला हवी व पूर्ण ‘प्रोडक्ट’ येथेच तयार व्हावेत यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन विश्राम जामदार यांनी केले. यावेळी नारायण मूर्ती यांच्या हस्ते निबंधस्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात अले. यात ‘व्हीएनआयटी’चा प्रथमेश जोशी, प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रदीप अटोले व सेंट विन्सेन्ट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयाची रिया चक्रवर्ती यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरेश शिंदे यांनी केले तर महेश गुप्ता यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)