शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मातृभाषेच्या शिक्षणातूनच देशाची प्रगती

By admin | Updated: January 9, 2016 03:38 IST

भाषा ही देशाच्या संस्कृतीचे द्योतक आहे. त्याचबरोबर देशाच्या प्रगतीचे महत्त्वाचे माध्यम आहे.

विजय भटकर : विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटननागपूर : भाषा ही देशाच्या संस्कृतीचे द्योतक आहे. त्याचबरोबर देशाच्या प्रगतीचे महत्त्वाचे माध्यम आहे. जपानसारख्या देशाने मातृभाषेच्या बळावर विज्ञानाच्या क्षेत्रात जगात सर्वाधिक प्रगती केली आहे. परंतु भारतात विज्ञानाचे शिक्षण हे परदेशी भाषेतून दिल्या जाते. भारतात विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतून दिल्यास भारतही जपानसारखी प्रगती करू शकेल. त्यामुळे शिक्षणाचा पाया बदलणे गरजेचे आहे. शिक्षण हे निव्वळ पुस्तकी न राहता, ते खेळ, संगीताच्या माध्यमातून देण्यात यावे, असे मत सुपर कम्प्युटरचे जनक पद्मश्री विजय भटकर यांनी व्यक्त केले. राही सेंट्रल स्कूलद्वारे आयोजित विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन भटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ कराड, माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, संगीततज्ज्ञ संजय उपाध्याक्ष, विजय राऊत, नारायण मोहोड उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी १८९३ साली विज्ञान आणि अध्यात्माच्या माध्यमातूनच विश्वाला सुख शांती लाभेल, असे सांगितले. परंतु आपल्या देशात अध्यात्माला अंधश्रद्धा म्हणून अथवा धार्मिक वृत्ती म्हणून बघितले जाते. आपला देश विविध धर्मात विभागला आहे. परंतु या सर्व धर्मग्रथांमध्ये जीवन पद्धती सांगितली आहे. निव्वळ धर्मग्रंथ वाचण्यापेक्षा त्यात दिलेल्या जीवन पद्धतीचे आचरण करणे गरजेचे झाले आहे. डॉ. एस. एन. पठाण पर्यावरणासंदर्भात बोलताना म्हणाले, भारतात केवळ ११ टक्के भाग वृक्षाखाली आहे. पर्यावरणाच्या नियमानुसार ३० टक्के भाग वृक्षाखाली असणे गरजेचे आहे. जपानचे पर्यावरणाच्या संर्वधनाचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. जपानचा ३३ टक्के भूभाग वृक्षाखाली आहे. जपानमध्ये पर्यावरणाच्या बाबतीत सरकारबरोबरच विद्यार्थी, नागरिक, पर्यावरणवादी संस्थांमध्ये खरोखरच कळकळ असल्याचे एक उदाहरण देऊन स्पष्ट केले. विज्ञान प्रदर्शनीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण व आरोग्याशी निगडित विज्ञानाचे मॉडेल साकारले आहेत. भटकरांनी सर्व मॉडेलची माहिती विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली. (प्रतिनिधी)