शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

नक्षलवाद्यांनी केलेली पत्रू दुर्गेची हत्या दलित अत्याचार होऊ शकते का?

By admin | Updated: September 15, 2015 06:10 IST

गावाच्या विकासासाठी लढणाऱ्या पत्रू दुर्गे या दलित नेत्याची नक्षलवाद्यांनी केलेली हत्या ही दलित अत्याचाराची

नागपूर : गावाच्या विकासासाठी लढणाऱ्या पत्रू दुर्गे या दलित नेत्याची नक्षलवाद्यांनी केलेली हत्या ही दलित अत्याचाराची घटना होऊ शकते का? असा प्रश्न सध्या अनुसूचित जाती-जनजाती आयोगासमोर उभा ठाकला आहे. भूमकाल संघटनेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर या अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नावर आयोगासमोर सोमवारी पहिली सुनावणी झाली. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील दामरंचा हे इंद्रावती नदीच्या तिरावर वसलेले गाव आहे. या गावात पत्रू दुर्गे नावाचे एक दलित कार्यकर्ते राहत होते. त्या परिसरातील ते एक ज्येष्ठ दलित कार्यकर्र्ते असून त्यांना चांगला मान होता. एकप्रकारे ते त्या परिसरातील नेते होते. आपल्या गावाच्या विकासासाठी गावात उपसा सिंचन योजना यावी, यासाठी ते प्रयत्नशील होते. ही योजना गावात यावी यासाठी त्यांनी शासन दरबारी अनेक निवेदने केली. थेट मुख्यमंत्र्यांना भेटून आले. या योजनेसाठी त्यांनी लोकांनाही संघटित केले होते. परंतु ही बाब नक्षलवाद्यांना खटकली. १९ एप्रिल रोजी १५ ते २० नक्षलवाद्यांनी गावात जाऊन पत्रू दुर्गे यांचा निर्घृण खून केला.यासंदर्भात भूमकाल संघटनेने अनुसूचित जाती -जनजाती आयोगाला तक्रार दाखल केली आणि पत्रू दुर्गे याची नक्षलवाद्यांनी केलेली हत्या ही दलित अत्याचार म्हणून घोषित करण्याची मागणी केली. या तक्रारीच्या आधारावर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अनुसूचित जाती जनजाती आयोगाचे अध्यक्ष सी.एस. थुल यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान दिवंगत पत्रू दुर्गे यांचा मुलगा पृथ्वीराज दुर्गे, भूमकाल संघटनेतर्फे दत्ता शिर्के, अरविंद सोवनी आणि गडचिरोली पोलिसांतर्फे डीवायएसपी गणेश बिरादार हे उपस्थित होते.सुनावणीदरम्यान मृताचा मुलगा पृथ्वीराज याने सांगितले की, माझे वडील हे दामरंचा व कमलापूर या भागातील दलित जनतेचे प्रश्न मांडायचे. समाजाला संघटित करण्याचा ते प्रयत्न करायचे. त्यामुळे त्यांची हत्या ही दलित हत्याच होय. तक्रारकर्त्या भूमकाल संघटनेतर्फे प्रा. अरविंद सोवनी यांनी आपली बाजू मांडतांना सांगितले की, आरोपी एका प्रतिबंधित पक्षाचे सदस्य होते. त्यांनी आपल्या नेत्याच्या आदेशावरून हत्या केली होती. त्यामुळे त्यांची ओळख महत्त्वाची नसून त्यांचा हेतू महत्त्वाचा आहे. या हत्येमागे त्यांचा हेतू हा होता की पत्रू दुर्गेच्या निमित्ताने विकासाची कास धरलेला व संघटित होणारा या भागातील दलित समाज धाकाने चूप बसेल. एकंदर हे या भागातील दलित समाजाला धमकावण्याचेच प्रकरण आहे. त्यामुळे हे दलित अत्याचाराचे प्रकरण आहे, अशी मांडणी त्यांनी केली. डीवायएसपी बिरादार यांनी सांगितले की, मूळ एफआयआरमध्ये अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे नसली तरी नंतर पत्रू दुर्गे प्रकरणाच्या या बाजूची दखल पोलिसांनी घेतली आहे. त्यांनी यासंदर्भातील कागदपत्रे आयोगासमोर सादर केली. १० ते १५ नक्षलवाद्यांचा या हत्येत सहभाग आहे. मात्र सर्वांनी ओळख पटलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. यावर आयोगाचे अध्यक्ष एस.सी. थूल यांनी गडचिरोली पोलिसांनी तीन आठवड्यात उर्वरित नक्षलींची ओळख पटवावी, असे निर्देश दिले. नक्षलवाद्यांची ओळख पटविल्यानंतरच हे जातीय अत्याचाराचे प्रकरण आहे किंवा नाही, याची शहानिशा करता येईल, असेही थूल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)