शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

१ जूनपासून कापसाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:26 IST

कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना काही सूचनाही विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यात १ जूनपासून कापसाच्या बियाण्यांची विक्री होणार आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडून खरीप हंगामाचे नियोजनकोरोनाच्या मार्गदर्शक सूचना पालन करण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना काही सूचनाही विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यात १ जूनपासून कापसाच्या बियाण्यांची विक्री होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी उत्पादने खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगसह शासकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.सोयाबीनच्या बाबतीत शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण तपासणी करावी. किमान ६५ टक्के उगवण क्षमता असलेले बियाणे जतन करून पेरणीकरिता वापरावे, असा सल्ला दिला आहे. खरीप हंगामात शेतीला लागणारी खते, बियाणे, कीटकनाशकाची उपलब्धता मुबलक राहील, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. विभागाने बियाण्यांमध्ये कापसाचे ५५८१, तूर ३९००, सोयाबीन ५७३७५, ज्वारी ३७५, मूग १८७, उडीद १८७, भूईमुंग २५५०, धान २१३७५ क्विंटलनुसार नियोजन केले आहे. तसेच खतांमध्ये युरिया डीएपी, एमओपी, सिंगल सुपर फॉस्फेट संयुक्त व मिश्र खतांचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन, कापूस व भात पिकाच्या सर्व वाणांची उत्पादकता जवळपास सारखीच असल्याने शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाची मागणी करू नये, असा सल्ला दिला आहे. अनधिकृत अथवा विनापरवाना बियाणे खरेदी करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहे. शेतमाल विक्री व्यवस्थापन व साहित्याची उपलब्धता यासंदर्भात तालुका व जिल्हास्तरावर तक्रार निवारण व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गुणवत्तापूर्ण कृषी साहित्य मिळावे यासाठी भरारी व दक्षता पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस