शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कॉटन मार्केट शनिवारपासून पुन्हा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 21:52 IST

जवळपास ५० दिवसानंतर सुरू झालेले कॉटन मार्केट गेल्या आठवड्यात केवळ एकच दिवस सुरू राहिले. आक्षेपानंतर अडतियांनी व्यवसाय करण्यास नकार दिल्याने बंद करण्यात आले. मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर पुन्हा शनिवारपासून मार्केट सुरू होणार आहे. मार्केट गुरुवारपासून सुरू होणार होते, पण बुघवारी आग लागल्याने शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय अडतियांनी घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जवळपास ५० दिवसानंतर सुरू झालेले कॉटन मार्केट गेल्या आठवड्यात केवळ एकच दिवस सुरू राहिले. आक्षेपानंतर अडतियांनी व्यवसाय करण्यास नकार दिल्याने बंद करण्यात आले. मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर पुन्हा शनिवारपासून मार्केट सुरू होणार आहे. मार्केट गुरुवारपासून सुरू होणार होते, पण बुघवारी आग लागल्याने शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय अडतियांनी घेतला आहे.बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी झाल्यानंतर निर्जंतुकीकरणासाठी मनपा आयुक्तांनी २८ मार्चपासून कॉटन मार्केट बंद करून शेतकऱ्यांसाठी शहरातील दहा जागेत बाजाराची निर्मिती करून भाज्यांची विक्री सुरू केली होती. पण या बाजारांनाही ग्राहकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्याने धंतोली यशवंत स्टेडियम येथील बाजार वगळता सर्वच बाजार बंद झाले. काही सुरूच झाले नाहीत. अडतियांच्या मागणीनंतर गेल्या आठवड्यात मार्केट सुरू झाले, पण मनपा कर्मचाऱ्यांचा अडतियांसोबत झालेला वाद आणि दरदिवशी केवळ ४० अडतियांना व्यवसायाची परवानगी दिल्यानंतर एकाच दिवसात मार्केट बंद करण्याचा निर्णय अडतियांनी घेतला. मार्केटमध्ये ८० अडतिये कार्यरत असताना मनपा अधिकाऱ्यांनी २४० जणांची यादी तयार करून प्रत्येक अडतियाला आठवड्यानंतर व्यवसायाची परवानगी दिली होती. यावरही अडतियांनी आक्षेप घेतला होता.महात्मा फुले अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, मार्केटमध्ये व्यवसायाची परवानगी बुधवारी मिळाली. गुरुवारपासून व्यवसाय करणे शक्य नाही. भाजी उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात भाज्या विक्रीसाठी आणण्यासाठी कळविण्यात येत आहे. आठवड्यात शुक्रवारी बाजार बंद असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाज्यांची विक्री शनिवारपासून सुरू होणार आहे. एकाच छताखाली भाज्यांची विक्री होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांनाही किफायत भावात भाज्या मिळतील, शिवाय अडतिये आणि व्यापाऱ्यांनाही उत्पन्न मिळेल. त्यामुळे आर्थिक साखळी पूर्ण होणार आहे. मार्केटमध्ये आगीच्या घटना वाढत आहे. बुधवारी २५ व्यापाऱ्यांची दुकाने जळाली असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अडतिया आणि व्यापाऱ्यांना पक्की दुकाने बांधून द्यावीत, अशी मागणी महाजन यांनी केली.

टॅग्स :Cotton Market, Nagpurकॉटन मार्केट