शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

कॉटन मार्केट शनिवारपासून पुन्हा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 21:52 IST

जवळपास ५० दिवसानंतर सुरू झालेले कॉटन मार्केट गेल्या आठवड्यात केवळ एकच दिवस सुरू राहिले. आक्षेपानंतर अडतियांनी व्यवसाय करण्यास नकार दिल्याने बंद करण्यात आले. मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर पुन्हा शनिवारपासून मार्केट सुरू होणार आहे. मार्केट गुरुवारपासून सुरू होणार होते, पण बुघवारी आग लागल्याने शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय अडतियांनी घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जवळपास ५० दिवसानंतर सुरू झालेले कॉटन मार्केट गेल्या आठवड्यात केवळ एकच दिवस सुरू राहिले. आक्षेपानंतर अडतियांनी व्यवसाय करण्यास नकार दिल्याने बंद करण्यात आले. मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर पुन्हा शनिवारपासून मार्केट सुरू होणार आहे. मार्केट गुरुवारपासून सुरू होणार होते, पण बुघवारी आग लागल्याने शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय अडतियांनी घेतला आहे.बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी झाल्यानंतर निर्जंतुकीकरणासाठी मनपा आयुक्तांनी २८ मार्चपासून कॉटन मार्केट बंद करून शेतकऱ्यांसाठी शहरातील दहा जागेत बाजाराची निर्मिती करून भाज्यांची विक्री सुरू केली होती. पण या बाजारांनाही ग्राहकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्याने धंतोली यशवंत स्टेडियम येथील बाजार वगळता सर्वच बाजार बंद झाले. काही सुरूच झाले नाहीत. अडतियांच्या मागणीनंतर गेल्या आठवड्यात मार्केट सुरू झाले, पण मनपा कर्मचाऱ्यांचा अडतियांसोबत झालेला वाद आणि दरदिवशी केवळ ४० अडतियांना व्यवसायाची परवानगी दिल्यानंतर एकाच दिवसात मार्केट बंद करण्याचा निर्णय अडतियांनी घेतला. मार्केटमध्ये ८० अडतिये कार्यरत असताना मनपा अधिकाऱ्यांनी २४० जणांची यादी तयार करून प्रत्येक अडतियाला आठवड्यानंतर व्यवसायाची परवानगी दिली होती. यावरही अडतियांनी आक्षेप घेतला होता.महात्मा फुले अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, मार्केटमध्ये व्यवसायाची परवानगी बुधवारी मिळाली. गुरुवारपासून व्यवसाय करणे शक्य नाही. भाजी उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात भाज्या विक्रीसाठी आणण्यासाठी कळविण्यात येत आहे. आठवड्यात शुक्रवारी बाजार बंद असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाज्यांची विक्री शनिवारपासून सुरू होणार आहे. एकाच छताखाली भाज्यांची विक्री होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांनाही किफायत भावात भाज्या मिळतील, शिवाय अडतिये आणि व्यापाऱ्यांनाही उत्पन्न मिळेल. त्यामुळे आर्थिक साखळी पूर्ण होणार आहे. मार्केटमध्ये आगीच्या घटना वाढत आहे. बुधवारी २५ व्यापाऱ्यांची दुकाने जळाली असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अडतिया आणि व्यापाऱ्यांना पक्की दुकाने बांधून द्यावीत, अशी मागणी महाजन यांनी केली.

टॅग्स :Cotton Market, Nagpurकॉटन मार्केट