शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
4
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
5
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
6
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
7
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
8
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
9
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
10
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
11
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
12
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
13
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
14
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
15
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
16
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
17
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
18
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
19
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
20
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...

कॉटन मार्केट बुधवारपासून पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:56 IST

तब्ब्बल ५० दिवसानंतर मंगळवारी सुरू करण्यात आलेले कॉटन मार्केट मनपा अधिकाऱ्यांची मनमानी आणि त्यांच्याकडून शेतकरी व अडतियांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे बुधवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय महात्मा फुले बाजार अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे बुधवारपासून भाजीबाजार भरणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्ब्बल ५० दिवसानंतर मंगळवारी सुरू करण्यात आलेले कॉटन मार्केट मनपा अधिकाऱ्यांची मनमानी आणि त्यांच्याकडून शेतकरी व अडतियांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे बुधवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय महात्मा फुले बाजार अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे बुधवारपासून भाजीबाजार भरणार नाही.

महात्मा फुले बाजार असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, मंगळवारी सकाळी नागपूर आणि अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी भाजीपाला बाजारात आणला. किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पण मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानीचा निषेध करीत बुधवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मनपा कर्मचाऱ्यांनी शिस्तीच्या नावाखाली शेतकरी आणि अडतियांवर दंडे उगारले आणि दडपशाही केली. मानेवाडा रोडच्या कडेला दररोज जवळपास भाज्यांच्या १०० गाड्या उभ्या राहतात. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. हिंमत असेल तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी दंडे उगारावेत आणि दडपशाही करावी, असे आव्हान महाजन यांनी दिले.कॉटन मार्केटचे अडतिये दोन बाजारात विभागले आहेत. एकूण २४२ अडतियांपैकी १६० कळमना भाजी बाजारात तर ८२ अडतिये कॉटन मार्केटमध्ये व्यवसाय करीत आहेत. याची माहिती मनपा अधिकाऱ्यांना असतानाही त्यांनी सरसकट २४२ जणांची यादी तयार करून दरदिवशी ४० अडतियांना व्यवसायाची परवानगी दिली. त्यामुळे एका अडतियाचा व्यवसायाचा क्रमांक सात दिवसानंतर येणार आहे. पहिल्या दिवशी व्यवसाय केलेल्या अडतियाला दुसऱ्या दिवशी उधारी वसुलीसाठी बाजारात येण्यास प्रतिबंध आहे. वेळापत्रकानुसार व्यवसाय करण्याचे त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. शिवाय बाजारात दिसल्यास दंड वसूल करण्यात येणार आहे. मनपा अडतियांकडून त्याच्या गाळ्याचे महिन्याचे भाडे वसूल करते. मग अडतियांवर निर्बंध कशासाठी, असा सवाल असोसिएशनने केला आहे. याच कारणावरून मनपाने १२ जणांवर दंड ठोठावला. अडतिया असोसिएशनचे पदाधिकारी आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विठ्ठल भेदे यांच्याकडूनही दंड वसूल केला. कॉटन मार्केटचे अडतिये कळमना बाजारात व्यवसाय करीत असल्याची माहिती मनपाला दिली, पण ते ऐकण्याच्या तयारीत नाहीत. सरसकट २४० अडतियांचे वेळापत्रक तयार केल्याने कॉटन मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्यांवर अडतियांवर अन्याय झाला आहे. कॉटन मार्केटमधील खऱ्यां ८२ अडतियांना दरदिवशी व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष शेख हुसेन आणि सचिव राम महाजन यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :Cotton Market, Nagpurकॉटन मार्केट