शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल भरण्यातच अर्धा पगार होतोय खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:16 IST

विजेच्या भरमसाट बिलामुळे नागरिक आधीच त्रासले आहेत. यातच ३ ते ५ हजार रुपयापर्यंत वीज बिल येत असल्याने नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे.

ठळक मुद्दे३ ते ५ हजारापर्यंत बिल आल्याने सामान्य नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विजेच्या भरमसाट बिलामुळे नागरिक आधीच त्रासले आहेत. यातच ३ ते ५ हजार रुपयापर्यंत वीज बिल येत असल्याने नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. उत्तर नागपुरातील इंदिरानगरसारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मजुरांचा अर्धा पगार तर विजेचे बिल भरण्यातच खर्च होत आहे, तेव्हा त्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.उत्तर नागपुरातील प्रभाग ५ मधील इंदिरा माता नगरात बहुतांश मजुरी करणारे लोक राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ही मंडळी विजेचे बिल पाहून चिंतेत पडले आहे. त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक बिल आल्याने ते एसएनडीएलच्या कार्यालयात गेले. तेव्हा त्यांना बिलमध्ये सूट देण्याऐवजी त्यांच्या वीज मीटरची तपासणी करण्यासाठी २७० रुपये भरण्याचा सल्ला देण्यात आला. सेमिनरी हिल्स येथील एसएनडीएल कार्यालयातही याप्रकारच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, विजेचे बिल मनमानी पद्धतीने पाठविले जात आहे. इंदिरा माता नगर येथील खेमाबाई यादव, राजवंती यादव यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या घरी इलेक्ट्रिक मीटर लावण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत इतके बिल कधीच आले नाही. परंतु आता हजारो रुपये बिल येत आहेत. मातीगोटे उचलण्याचे काम करून आम्ही आमचा उदरनिर्वाह चालवतो. तेव्हा इतके बिल कसे भरायचे. येथील लोक सकाळी लवकरच कामासाठी बाहेर पडतात. रात्री येतात.अशावेळी २०० ते ३०० रुपये विजेचे बिल आले तरी पुष्कळ आहे. तेव्हा इतके विजेचे बिल कोणत्या हिशेबाने पाठविण्यात आले आहे, याची चौकशी व्हावी. गडबड करणाऱ्यांवर कारवाई व्हावी.स्थानिक रहिवासी झडिराम साहू व मूलचंद साहू यांनी सांगितले की, ंमहिन्याला कसेबसे ८ ते ९ हजार रुपये कमावणाºयांना ३ ते ५ हजार रुपये विजचे बिल पाठविण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंब पोसायचे कसे? यावेळी आलेले विजेचे बिल तब्बल चौपट कसे काय झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.सध्या जास्त बिल येत असल्यास नागरिकांना मीटर तपासण्याचा सल्ला देणाºया एसएनडीएलला बिलामध्ये करण्यात येत असलेल्या नोंदीचीही चौकशी करण्याची गरज आहे. चार वर्षांपूर्वी तुळशीबाग येथील वीज विभागाच्या कार्यालयासमोर वाढलेले बिल आल्यावर नागरिकांनी विजेच्या बिलांची होळी केली होती. त्यावेळी आंदोलन करणारे आज सत्तेत आहेत. तरीही विजेचे बिल त्या तुलनेत अधिक येत आहे. इतकेच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांनाही भरमसाट बिल पाठवले जात आहे.

टॅग्स :electricityवीज