शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

विद्यार्थ्यांच्या खिचडीवर भ्रष्टाचाराचे लोणी

By admin | Updated: February 22, 2016 02:56 IST

राजीवनगर येथील शांतिनिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खिचडीतून झालेल्या विषबाधेचे प्रकरण ताजे असताना खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात भ्रष्टाचाराची ‘खिचडी’ शिजत आहे.

कलोडे विद्यालयात तांदूळ घोटाळा : आधी कारवाई नंतर दिलासा कसा ?जितेंद्र ढवळे नागपूरराजीवनगर येथील शांतिनिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खिचडीतून झालेल्या विषबाधेचे प्रकरण ताजे असताना खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात भ्रष्टाचाराची ‘खिचडी’ शिजत आहे. याप्रकरणी आधी दोषी मुख्याध्यापिकेवर कारवाईचा ठपका ठेवणाऱ्या जि.प.च्या शिक्षण विभागानेही मुख्याध्यापिकेची वैयक्तिक मान्यता पूर्ववत केली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या या खिचडीत शिक्षण विभाग तर हात धूत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे !खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात विविध तक्रारीच्या आधारावर जिल्हा परिषद नागपूर शिक्षण विभागाने (माध्यमिंक) चौकशी केली होती. यात पथकाने शाळेतील वेतन देयक आणि शालेय पोषण आहाराचे रजिस्टरही तपासले होते. यात शाळेला दि. २१ डिसेंबर २०१५ रोजी ६ क्विंटलचा तांदूळ पुरवठा झाल्याची नोंद आढळली. मात्र प्रत्यक्षात शाळेत १६ क्विंटल तांदूळ आढळून आला होता. यावर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात नाही का, अशी विचारणा शिक्षण विभागाच्यावतीने मुख्याध्यापिका रजनी डहाके यांना करीत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. यासोबत शाळेतील कर्मचाऱ्यांच्या विविध तक्रारींचे निराकरण करण्याच्या सूचनाही या पत्रात करण्यात आल्या होत्या. याबाबत २४ तासांत मुख्याध्यापिकेने खुलासा करावा, अन्यथा आपल्यावर एकतर्फी कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद यात देण्यात आली होती. मात्र याप्रकरणी मुख्याध्यापिकेने उत्तर सादर केली नसल्याचा आधार घेत ८ जानेवारी २०१६ रोजी महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नियम २८ अन्वये डहाके यांची वैयक्तिक मान्यता रद्द करण्यात आली होती. यानंतर १९ जानेवारीला माध्यमिक शिक्षण विभागाने एक पत्र पाठवित शाळेतील एका सहायक शिक्षकाला मुख्याध्यापक पदाचा पदभार देण्याच्या सूचना शाळा संचालकांना केल्या होत्या. यासोबतच ६ महिन्याच्या आत मुख्याध्यापकाचे नवीन पद भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. १९ दिवसांत काय घडले ?नागपूर : मात्र या घटनेच्या १९ दिवसांच्या आताच मुख्याध्यापिकेची मान्यता रद्द करणाऱ्या, शाळा संचालकांना मुख्याध्यापकांचे नवीन पद भरण्याच्या कडक सूचना देणाऱ्या शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या पत्राचा आधार घेत डहाके यांची रद्द केलेली मान्यता पूर्ववत केली. यात मुख्याध्यापिकेने शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या तक्रारीचे निराकरण केले असल्याचा दाखला देण्यात आला आहे.मुळात मुख्याध्यापिकेने कर्मचाऱ्यांचे निराकरण केल्याची शाबासकी देणाऱ्या शिक्षण विभागाला यावेळी शाळेतील पोषण आहारात अपहार झाला होता, शिक्षण विभागाच्या कारवाईत तसे आढळूनही आले होते, याचा विसर मात्र पडला. त्यामुळे १९ दिवसांत शाळा आणि शिक्षण विभागात भ्रष्टाचाराची ‘खिचडी’ शिजली का ? यात ‘तूप’ कुणी टाकले, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे.गुरुनानक जयंतीलाही शिजली खिचडी प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयातील ‘खिचडीकथा’ नव्या नाही. या विद्यालयात सार्वजनिक सुटीच्या दिवशीही खिचडी शिजली आहे. मात्र सुटीच्या दिवशी खिचडी कुणी खाल्ली, असा प्रश्न १० एप्रिल २००६ रोजी तत्कालीन शिक्षणाधिकारी राजेंद्र गोधने यांनीही पडला होता. याच कलोडे विद्यालयात २००४-२००५ या शैक्षणिक वर्षांत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ शिजवून वाटप केल्याबाबतच्या देयकात जुलै-०४ ते मार्च ०५ या कालावधीत प्रत्यक्ष हजेरी पटावरील उपस्थितीपेक्षा तांदूळ शिजवून वाटप करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक दर्शविण्यात आली होती. यात देयकामध्ये दर्शविण्यात आलेली विद्यार्थ्यांची उपस्थिती ही हजेरी पटावरील उपस्थितीपेक्षा ४४ ने अधिक होती. इतकेच काय तर २६ नोव्हेंबर २००४ रोजी गुरुनानक जयंती निमित्त सार्वजनिक सुटी असतानाही शाळेने तांदूळ शिजविल्याचे देयक सादर केले होते आणि अनुदानही स्वीकारले होते. त्यावेळी लोकआयुक्तांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती.