शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ ला मोदींच्या घरातूनच सुरुंग

By admin | Updated: April 30, 2015 02:22 IST

देशातील भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठमोठी आव्हाने करण्यात येत आहेत.

नागपूर : देशातील भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठमोठी आव्हाने करण्यात येत आहेत. परंतु ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ या संकल्पनेला मोदी यांच्या घरूनच आव्हान मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी खुलेपणाने भ्रष्टाचाराचे समर्थन केले आहे. नागपुरात आयोजित एका पत्रपरिषदेदरम्यान रेशन दुकानदारांच्या मुद्यावर बोलताना प्रल्हाद मोदी यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली.‘आॅल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स’चे उपाध्यक्ष असलेले प्रल्हाद मोदी हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याविषयी माहिती देत असताना मोदी यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. देशातील सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच रेशनच्या व्यवस्थेत फारसा फरक पडलेला नाही. आता ही प्रणाली ‘हायटेक’ रूप घेत आहे. परंतु दुसरीकडे दुकानदारांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. रेशन दुकानदारांप्रती केंद्र शासनाचे धोरण उदासीन आहे. मागणी अगोदरच कमी झाली असताना दुकानदारांना अत्यल्प कमिशनवर काम करावे लागत आहे. अशा स्थितीत कुटुंबीयांना पोसण्यासाठी दुकानदारांना गैरप्रकार करावे लागतात. अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात काहीच वावगे नाही असे मोदी यांनी प्रतिपादन केले. यासंदर्भात मार्च महिन्यात नवी दिल्ली येथे मोठे आंदोलन उभारले होते. केंद्र शासनाने रेशन दुकानदारांना महिन्याला २५ हजार रुपये तरी कमिशन मिळेल असे धोरण तयार करावे किंवा त्यांना शासकीय कर्मचारी तरी घोषित करावे अशी मागणी मोदी यांनी केली. संपूर्ण देशासाठी एकच धोरण तयार करण्याची गरज आहे. मागील शासनांप्रमाणेच मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनेदेखील या मुद्यावर मौन साधले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यात लक्ष घालावे असेदेखील ते म्हणाले. (प्रतिनिधी)