शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ ला मोदींच्या घरातूनच सुरुंग

By admin | Updated: April 30, 2015 02:22 IST

देशातील भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठमोठी आव्हाने करण्यात येत आहेत.

नागपूर : देशातील भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठमोठी आव्हाने करण्यात येत आहेत. परंतु ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ या संकल्पनेला मोदी यांच्या घरूनच आव्हान मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी खुलेपणाने भ्रष्टाचाराचे समर्थन केले आहे. नागपुरात आयोजित एका पत्रपरिषदेदरम्यान रेशन दुकानदारांच्या मुद्यावर बोलताना प्रल्हाद मोदी यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली.‘आॅल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स’चे उपाध्यक्ष असलेले प्रल्हाद मोदी हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याविषयी माहिती देत असताना मोदी यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. देशातील सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच रेशनच्या व्यवस्थेत फारसा फरक पडलेला नाही. आता ही प्रणाली ‘हायटेक’ रूप घेत आहे. परंतु दुसरीकडे दुकानदारांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. रेशन दुकानदारांप्रती केंद्र शासनाचे धोरण उदासीन आहे. मागणी अगोदरच कमी झाली असताना दुकानदारांना अत्यल्प कमिशनवर काम करावे लागत आहे. अशा स्थितीत कुटुंबीयांना पोसण्यासाठी दुकानदारांना गैरप्रकार करावे लागतात. अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात काहीच वावगे नाही असे मोदी यांनी प्रतिपादन केले. यासंदर्भात मार्च महिन्यात नवी दिल्ली येथे मोठे आंदोलन उभारले होते. केंद्र शासनाने रेशन दुकानदारांना महिन्याला २५ हजार रुपये तरी कमिशन मिळेल असे धोरण तयार करावे किंवा त्यांना शासकीय कर्मचारी तरी घोषित करावे अशी मागणी मोदी यांनी केली. संपूर्ण देशासाठी एकच धोरण तयार करण्याची गरज आहे. मागील शासनांप्रमाणेच मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनेदेखील या मुद्यावर मौन साधले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यात लक्ष घालावे असेदेखील ते म्हणाले. (प्रतिनिधी)