शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नोटा बदलीने भ्रष्टाचार संपणार नाही

By admin | Updated: February 14, 2017 02:17 IST

देशातील लोकांना बेरोजगारी, विषमता आणि गुलामीतून मुक्त करणे गरजेचे असून, केवळ नोटा बदलून काळा पैसा व भ्रष्टाचार नष्ट होणार नाही, ...

न्या. पी. बी. सावंत : मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे अधिवेशननागपूर : देशातील लोकांना बेरोजगारी, विषमता आणि गुलामीतून मुक्त करणे गरजेचे असून, केवळ नोटा बदलून काळा पैसा व भ्रष्टाचार नष्ट होणार नाही, तर त्यासाठी व्यवस्थाच बदलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी केले.मानकापूर येथील क्रीडा संकुलात आयोजित महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशनात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संजय घोडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे संचालक अभिजित देशपांडे, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, महापारेषण कंपनीचे संचालक ओमप्रकाश एम्पाल, स्वतंत्र मजदूर युनियनचे अध्यक्ष जे. एस. पाटील, सरचिटणीस एन. बी. जारोंडे, कार्याध्यक्ष प्रेमानंद मौर्य, मुख्य संघटक एस. के. हनवते उपस्थित होते. माजी न्या. सावंत म्हणाले, सध्याच्या काळात जगातील कामगारांवर आपत्ती आली आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार ६९ टक्के कामगारांची कपात होणार आहे. त्यामुळे घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होण्यासाठी लढा देण्याची गरज आहे. महावितरणचे संचालक अभिजित देशपांडे, चंद्रकांत थोटवे, ओमप्रकाश एम्पाल यांनी कंपन्यांसमोर उभ्या असलेल्या आव्हानांवर व स्पर्धेवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक एन. बी. जारोंडे यांनी केले. संचालन एच. पी. ढोके यांनी केले. आभार ए. जी. पठाण यांनी मानले.यावेळी ऊर्जा श्रमिक मुखपत्राचे लोकार्पण करण्यात आले. अ‍ॅड. वैशाली डोळस यांनी भारतीय महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला. अधिवेशनाला महाराष्ट्रासह देशाच्या इतर राज्यातील सहा हजार वीज कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)